
-
ऋजुता लुकतुके
बीसीसीआयने २०२५-२६ च्या हंगामात देशांत होणाऱ्या स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय सामन्यांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. २०२६ मध्ये टी-२० विश्वचषक आणि तो ही भारतातच होणार आहे. भारताला विजेतेपद राखण्याची संधी आहे. या महत्त्वाच्या स्पर्धेपूर्वी न्यूझीलंडचा संघ जानेवारी २०२६ मध्ये भारतात ३ एकदिवसीय सामने आणि ५ टी-२० सामन्यांसाठी येणार आहे. या दौऱ्याचं वेळापत्रक बीसीसीआयने जाहीर केलं आहे. टी-२० विश्वचषकाची तयारी म्हणून या मालिकेकड बघितलं जात आहे. (India Domestic Calendar)
या दौऱ्यातील एकदिवसीय सामने बडोदा, राजकोट आणि इंदोर इथं होतील. तर पाच टी-२० सामने अनुक्रमे नागपूर, रायपूर, गुवाहाटी, वायझॅग आणि त्रिवेंद्रम इथं होणार आहेत. इंग्लंड दौऱ्यानंतर भारतीय संघ बांगलादेश आणि ऑस्ट्रेलियाला जाणार आहे. त्यानंतर न्यूझीलंड विरुद्धची मालिका ही देशातील पहिलीच आंतरराष्ट्रीय मालिका असेल. देशांतर्गत क्रिकेटबद्दल बोलायचं झालं तर २८ ऑगस्टपासून दुलिप करंडकाने या हंगामाची सुरुवात होईल. तर ३ एप्रिल २०२६ रोजी महिलांच्या विभागीय स्पर्धेनं या हंगामाची सांगता होईल. देशांतर्गत कार्यक्रमातील महत्त्वाचे बदल समजून घेऊया, (India Domestic Calendar)
(हेही वाचा – India Tour of England : इंग्लंडमधील सराव सामन्यात बुमराहला सूर गवसला का?)
- पुरुषांसाठीची दुलिप करंडक स्पर्धा आणि महिलांसाठीची विभागीय स्पर्धा यांमध्ये आता ६ विभागीय संघ असतील.
- देशांतर्गत सामन्यात प्लेट स्तरावरील संघ ठरवण्यासाठीचे निकष बदलण्यात आले आहेत. आधीच्या हंगामातील तळाचे ६ संघ प्लेट विभागात खेळतील.
- दर हंगामात एलिट आणि प्लेट विभागात फक्त एकच संघ बदलेल. बाकीचे तसेच राहतील.
- सय्यद मुश्ताक अली आणि महिलांची देशांतर्गत टी-२० स्पर्धांमध्ये साखळीनंतर सुपरलीग टप्पा असेल. साखळीनंतर लगेच बाद फेरी रंगणार नाही.
- महत्त्वाच्या सगळ्या स्पर्धांमध्ये गट पाडताना ४ एलिट आणि १ प्लेट विभागातील संघ धरून गट पाडले जातील.
स्पर्धात्मकता वाढावी आणि स्पर्धेत संतुलन साध्य व्हावं यासाठी बीसीसीआयने हे बदल केले आहेत. या हंगामापासूनच ते लागू होतील. (India Domestic Calendar)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community