Maval Bridge Collapse : मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवरील जुना पूल कोसळून मोठी दुर्घटना झाली. पुल कोसळल्याच्या दुर्घटने(Maval Bridge Collapse)त ३० हून अधिक पर्यटक वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यानंतर आता पूलाच्या बांधकामाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहेत. या दुर्घटने(Maval Bridge Collapse)त २ जणांचा मृत्यू झाला असून याच्या मृत्यूला जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. दरम्यान, याच पुलाला निधी मंजूर झाला असतानाही पुनर्निमाणाचे काम का सुरू झाले नाही, याबाबत तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.(Maval Bridge Collapse)
(हेही वाचा Maval येथील ‘तो’ पूल अनेक महिन्यांपासून होता बंद तरीही कसा कोसळला? जाणून घ्या… )
विशेष म्हणजे पूल दुर्घटने(Maval Bridge Collapse)नंतर शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजावर आक्षेप घेतला जात आहे. एकंदरीत, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे दुर्घटने(Maval Bridge Collapse)त निष्पाप लोकांचा जीव गेल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने कुंडमळा साकव पुलापासून नवीन पुलाच्या निर्मितीकरिता नियोजनदेखील करण्यात आले होते. त्याचबरोबर, ८ कोटींचा निधीसुध्दा मंजूर केला होता. तरीदेखील अद्याप काम सुरू करण्यात आले नाही.
नवीन पुलास मंजुरी मिळाली, पण बांधकाम सुरूच झाले नाही
नदीच्या पलीकडील बाजूच्या दोन खांबामधील अंतर अधिक असल्याने पुलाला हादरे बसत होते. त्यामुळे मागील काही दिवसांपासून पूल दुरुस्त करावा, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात होती. मात्र, त्याकडे साफ दुर्लक्ष केले गेले. महत्त्वाचे म्हणजे १७० मीटर लांबीच्या पुलाच्या निर्माणाकरिता ८ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता. तसेच, निविदा प्रक्रियाही पूर्ण होऊन दि. १० जूनला काम सुरू करण्याचे आदेशही दिले गेले. त्यासाठी बारा महिन्यांची मुदत देण्यात आली होती. मात्र, अद्याप काम सुरू झाले नाही.
दुर्घटनाग्रस्त पूलाचा इतिहास काय?
मावळमधील इंद्रायणी नदीवरील पूल १९९३ मध्ये पूल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने उभारण्यात आला होता. तत्कालीन स्थानिक लोकप्रतिनिधी अण्णा जोशी यांच्या निधीतून सुमारे १० लाख रुपये खर्चून पुलाचा काही भाग बांधण्यात आला होता. उर्वरित पुलाचे बांधकाम तत्कालीन आमदार दिवंगत आमदार दिगंबर भेगडे यांच्या प्रयत्नातून राज्य शासनाच्या माध्यमातून करण्यात आले होते. या कामासाठी पुन्हा सुमारे १० लाख रुपये खर्च करण्यात आला होता.(Maval Bridge Collapse)