पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे एक साकव पूल कोसळून भीषण अपघात (Maval Bridge Collapse) झाला. या पुलावर त्यावेळी 150 ते 200 पर्यटक होते. वजनामुळे हा पूल कोसळला. त्यात दोन जणांचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. 6 जण गंभीर असून 38 जणांचा जीव वाचवण्यात यश आले आहे. मात्र रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरू होती. प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षाबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोनवरुन संपर्क करून सर्व माहिती जाणून घेतली. तसेच पूल दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केले. याप्रकरणी सरकारने मृतांच्या नातलगांना 5 लाख रुपये नुकसान भरपाई म्हणून दिले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधून घटनेविषयी (Maval Bridge Collapse) चर्चा केली. अमित शहा यांनी एक्सवर पोस्ट केली आहे, “पूल गिरने की घटना से दुखी हूं. पीड़ित परिवार के प्रति संवेदना. घायलों के जल्दी ठीक होने की कामना,” अशी संवेदना शहा यांनी व्यक्त केली आहे. माजी सनदी अधिकारी महेश झगडे म्हणाले, “इंद्रायणी पूल कोसळला. (Maval Bridge Collapse) मी पुन्हा सांगतोय, अधिकाऱ्यांची गेंड्याची कातडी बळावतेय.”समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते अबू आझमी म्हणाले, “पर्यटन क्षेत्र म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या मावळमधील एक पूल कोसळून (Maval Bridge Collapse) अनेक जणांचा जीव गेला आहे. मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली आणि जखमी झालेले नागरिक, पर्यटक लवकरच बरे व्हावेत, यासाठी प्रार्थना. नदीत अडकलेल्यांना तातडीने मदत द्यावी.
दरम्यान हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मिडियात व्हायरल होऊ लागळ असून नागरिकांनी प्रशासनावर दोषारोप केले आहेत. नागरिक प्रदीप थत्ते म्हणाले, “हे सगळं इंस्टाग्रामच्या इन्फ्लुएन्सर मुले-मुलींनी या ब्रिजवर उभे राहून इतक्या रिल्स टाकल्या की, सगळी गर्दी वाढली तिथे. हा पूल जुना आहे, गावातले लोक नेहमी सांगत असत त्यावर जास्त गर्दी करू नका. पण नाही, लोक उलट दुचाकी गाड्या घेऊन घुसत होते. आगाऊपणा नडत आहे. अशाच घटना दरवर्षी भुशी डॅमलाही घडतात. (Maval Bridge Collapse)
अजिंक्य आयरेकर म्हणाले, “उत्साहातून लोकांकडून होणारी निष्काळजीपणा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रशासकीय दुर्लक्ष. असंवेदनशील प्रशासकीय लोक परिस्थितीला नरक बनवत आहेत. आता प्रशासकीय नाटक, दोषारोपाचा खेळ सामान्य लोकांचे जीव घेतल्यानंतर सुरू होईल. सार्वजनिक ठिकाणी बारकाईने लक्ष नाही, नियोजन नाही आणि सार्वजनिक सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्याने सामान्य लोकांना त्रास सहन करावा लागत आहे.
आनंद झांबरे म्हणाले, “मृत्यू हा स्वस्त झाला आहे. याच्याशी कुणाला काही देणं-घेणं नाही. फक्त राजकारण आणि भ्रष्टाचार. तो भाऊ आला जवळ आणि हा भाऊ जवळ आला यामध्येच आपण आहोत. जोपर्यंत आपण स्वतःहून सुधारणार नाही, या गोष्टी चालतच राहणार.
Join Our WhatsApp Community