Railway Accident : दिवा-मुंब्रा स्थानकादरम्यान सोमवार, ०९ जूनला दोन उपनगरीय लोकल जवळून जात असताना १२ प्रवासी पडले होते. यात ०८ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. तर या रेल्वे दुर्घनटे(Railway Accident)त अन्य काही प्रवासी जखमी झाले होते. रेल्वे रुळांशेजारील लोकांना घर सोडण्याची रेल्वे प्रशासनाची नोटीस मिळाली होती. परंतु, यास राजकारण्यांकडूनच अडथळा आणण्याचा प्रयत्न होताना दिसून आले आहे.(Railway Accident)
रेल्वेच्या नोटीशीनंतर शहाणपणा केल्यास रेल्वे बंद पाडू, असा इशारा राष्ट्रवादी(श.प. गट) नेते जितेंद्र आव्हाड यांनी रेल्वे प्रशासनाला दिला. तसेच, आम्हाला आंदोलन करायला भाग पाडू नका. ६० वर्षांपासून राहत असलेल्या लोकांना तुम्ही कसं हटवू शकता. रेल्वे रुळांशेजारील लोकांना घर सोडण्याची रेल्वे प्रशासनाची नोटीस मिळाली होती. त्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी थेट रेल्वे प्रशासनाला इशारा दिला.
दरम्यान, रेल्वे ट्रॅकमध्ये असलेली अरुंदी अपघातांना निमंत्रण देते. परंतु, हीच अरुंद असलेली जागा रुंद करण्यासाठी रेल्वेला अधिकच्या जागेची आवश्यकता आहे. जागा मिळविण्याकरिता रेल्वे प्रशासन प्रयत्नदेखील करताना दिसून येत आहे. तसेच, रेल्वेच्या प्रयत्नांना आडकाठी करणाऱ्यांची देखील कमी नाही. विशेष म्हणजे, राष्ट्रवादी श.प. गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी रेल्वे प्रशासनाला इशारा दिला होता. त्यामुळे रेल्वे अपघात टाळता येऊ शकतात, परंतु, विरोधकांनी राजकारणाला बाजूला ठेवायला हवे.(Railway Accident)
Join Our WhatsApp Community