-
ऋजुता लुकतुके
यंदा ३० एप्रिल २०२५ ला अक्षय्य तृतीयेचा दिवस होता. हा दिवस शुभ आणि साडेतीन मूहूर्तांपैकी एक मानला जातो. कारण, या दिवशी सुरू केलेल्या शुभ कार्यात खंड पडत नाही आणि या दिवशी केलेली गुंतवणूक ही अक्षय्य राहते असा लोकांचा विश्वास आहे. या दिवशी अनेक घरांमध्ये सोनं खरेदी केली जाते. त्यामुळे भारतात सोन्याच्या दरांचा अभ्यास करताना हा दिवस महत्त्वाचा ठरतो. या दिवशीच्या सोन्याचा किमतींचा तौलनिक अभ्यास नेहमी केला जातो. यंदा अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोनं ९५,००० चा स्तर पार करून वर गेलं होतं. तिथून पुढे हा कल कायम राहून लवकरच सोन्याने १ लाखांचा आकडाही गाठला. पण, याच पद्धतीने सोन्याचे मागील पाच वर्षांतील कल पाहिले तर सोनं तब्बल दुपटीने म्हणजे १०० टक्के वाढल्याचं लक्षात येईल. त्याचाच आढावा घेऊया, (Akshaya Tritiya Gold Rate)
(हेही वाचा – BCCI After Bengaluru Stampede : विजयोत्सवासाठीचे नियम करणार कडक; बीसीसीआयचा विचार सुरू)
केडिया अॅडव्हायझरीच्या आकडेवारीनुसार, गेल्या पाच वर्षांत सोन्याने दरवर्षी सरासरी १४.८५ % इतका प्रभावी परतावा दिला आहे. एप्रिल २०२० मध्ये १० ग्रॅमसाठी ४७,६७७ इतका असलेला सोन्याचा दर एप्रिल २०२५ मध्ये ९५,५९१ रुपयांवर पोहोचला होता. त्यानंतर तो एक लाखांवर पोहोचला आहे. हा वार्षिक परतावा ३१.४४ % इतका असून जागतिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या टिकाऊ मूल्याची साक्ष देतो. (Akshaya Tritiya Gold Rate)
(हेही वाचा – CISM Certificate Cost in India : भारतात सीआयएसएम सर्टिफिकेशनसाठी किती खर्च येतो?)
रिलायन्स सिक्युरिटीजचे ज्येष्ठ संशोधन विश्लेषक जिगर त्रिवेदी याविषयी सांगतात, सोन्याच्या किमतींमध्ये झालेली झपाट्याने वाढ – २०२३ मध्ये १३ %, २०२४ मध्ये २७ %, आणि २०२५ मध्ये आतापर्यंतच २६ टक्के इतकी आहे. यामध्ये कमकुवत होत चाललेला अमेरिकन डॉलर, वाढते जागतिक भू-राजकीय धोके, सुरक्षित गुंतवणुकीकडे कल आणि मध्यवर्ती बँकांकडून मोठ्या प्रमाणावर खरेदी या प्रमुख घटकांचा समावेश आहे. मात्र, त्रिवेदी यांचे म्हणणे आहे की या वाढीमागील मुख्य सकारात्मक प्रवाह आता मंदावू लागले आहेत, त्यामुळे पुढच्या काळात किंमत स्थिर होण्याची शक्यता आहे. “गेल्या अक्षय तृतीयेनंतर सोन्याने सुमारे ३२ % परतावा दिला आहे. मात्र, पुढील वर्षासाठी सोनं केवळ धार्मिक किंवा समारंभिक कारणांसाठीच खरेदी करावं आणि गुंतवणुकीच्या उद्देशाने नाही, असं सुचवलं जातं आहे. परतावा केवळ ६ ते ७ टक्क्यांच्या दरम्यान राहील, जो सध्या असलेल्या महागाई दरास अनुरूप आहे असं केडिया यांचं म्हणणं आहे. (Akshaya Tritiya Gold Rate)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community