Ahmedabad Plane Crash दुर्घटनेत दोन मोठे चमत्कार ! धातू वितळला पण भगवद्गीतेचं एक पानही नाही जळालं …

Ahmedabad Plane Crash दुर्घटनेत दोन मोठे चमत्कार ! धातू वितळला पण भगवद्गीतेचं एक पानही नाही जळालं ...

557
Ahmedabad Plane Crash दुर्घटनेत दोन मोठे चमत्कार ! धातू वितळला पण भगवद्गीतेचं एक पानही नाही जळालं ...
Ahmedabad Plane Crash दुर्घटनेत दोन मोठे चमत्कार ! धातू वितळला पण भगवद्गीतेचं एक पानही नाही जळालं ...

अहमदाबादहून (Ahmedabad Plane Crash) लंडनच्या दिशेने जाणारे एअर इंडियाचे AI-171 विमानाचा गुरूवारी (१२ जून) भीषण अपघात झाला. या अपघातात २४१ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर, यामध्ये एकच प्रवासी सुखरूप वाचला. सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर केवळ काहीच मिनिटांत एअर इंडियाचे विमान मेघानीनगर परिसरात कोसळले. यात 12 क्रू मेंबर्सचा देखील समावेश आहे. (Ahmedabad Plane Crash)

स्फोटानंतर या परिसरात फॉरेन्सिक टीम पोहोचली आहे. अपघाताचे कारण शोधण्यासाठी टीम ढिगाऱ्यांची तपासणी करत आहे. या घटनेची चौकशी करण्यासाठी अनेक केंद्रीय एजन्सी सक्रिय आहेत. यादरम्यान, एक आश्चर्यचकित करणारी मोठी गोष्ट समोर आली आहे. या विमान अपघातात प्रचंड मोठे नुकसान झाले, धातु पणं वितळलं, हॉस्टेलच्या इमारतीचा पिलरसुद्धा वाकला पणं भगवद्गीतेचं एक पानही जळालं नाही. कदाचित कुणी प्रवासी हा ग्रंथ घेऊन प्रवास करत असावा. (Ahmedabad Plane Crash)

तेथे उपस्थित नागरिकही या घटनेला चमत्कार म्हणत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये एक व्यक्ती दुर्घटनास्थळावर आढळलेली एक भगवद्गीतेची प्रत आणि तिची पाने दाखवताना दिसत आहे. या भीषण अपघातात जवळपास पूर्णपणे जळालेल्या आणि तुकडे तुकडे झालेल्या विमानात भगवद्गीता सुखरूप आढळणे केवळ चमत्कारच मानले जात आहे. (Ahmedabad Plane Crash)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.