एका पत्रकारामुळे फुटली युती! अन्यथा BJP-MNS ची जोडी 12 वर्षांपूर्वीच जुळली असती…

114
एका पत्रकारामुळे फुटली युती! अन्यथा BJP-MNS ची जोडी 12 वर्षांपूर्वीच जुळली असती…
  • प्रतिनिधी

सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात झालेल्या बैठकीनंतर भाजपा-मनसे (BJP-MNS) युतीचे संकेत पुन्हा एकदा गडद झाले आहेत. मुंबईतील ताज लँड्स एन्ड हॉटेलमध्ये ही बैठक झाली असून, आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युतीसंदर्भात सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात आज चर्चेचा केंद्रबिंदू असलेली भाजपा-मनसे जवळीक, प्रत्यक्षात 12 वर्षांपूर्वीच साकार होणार होती. मात्र एका पत्रकाराच्या ‘स्कूप’मुळे ती ऐतिहासिक युती मोडीत निघाली होती, असा गौप्यस्फोट खुद्द राज ठाकरे यांनीच केला आहे.

याआधीही लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपूर्वी अशाच चर्चांना उधाण आले होते. मात्र अधिकृत युती शक्य झाली नव्हती. राज ठाकरे यांनी त्या वेळी महायुतीला बाहेरून पाठिंबा दिला होता. विधानसभा निवडणुकीत मात्र मनसेने स्वतंत्र लढत दिली होती. परंतु यंदा परिस्थिती वेगळी आहे. अधिकृत युतीची चर्चा फडणवीस-ठाकरे भेटीत स्पष्टपणे समोर आली आहे. परंतु या पार्श्वभूमीवर एक जुना घटनाक्रम पुन्हा आठवला जात आहे, जो 12 वर्षांपूर्वी भाजपा-मनसे (BJP-MNS) युतीच्या अडथळ्याचं कारण ठरला होता. ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्या The Election That Changed India 2014 या पुस्तकात याबाबतचा उल्लेख आहे.

(हेही वाचा – Ahmedabad plane crash : मुलाची भेट राहूनच गेली; सांगोल्यातील दांपत्याची व्यथा)

पुस्तकानुसार, 2014 लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांची पंतप्रधान पदासाठी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांची जबाबदारी नितीन गडकरी यांच्याकडे होती. भाजपामध्ये मनसेसोबत (BJP-MNS) युती करण्याचा विचार प्रबळ होत होता. कारण 2009 मध्ये मनसेच्या उमेदवारांनी महायुतीच्या विजयावर मोठा परिणाम केला होता. मात्र शिवसेनेचा या युतीला तीव्र विरोध होता.

या पेचातून मार्ग काढण्यासाठी नितीन गडकरी आणि राज ठाकरे यांच्यात गुप्त बैठक आयोजित करण्यात आली होती. पण ही गोपनीयता फार काळ टिकली नाही. राज ठाकरे यांच्या म्हणण्यानुसार, “आम्ही दोघं हॉटेलच्या लिफ्टमध्ये होतो. पण एका पत्रकाराने आम्हाला पाहिलं आणि दुसऱ्याच दिवशी मीडियामध्ये ही बातमी फोडली गेली.” त्यामुळे नियोजित युती पूर्ण होण्याआधीच धुळीस मिळाली. परिणामी, राज ठाकरे यांनी त्या वेळी उमेदवार उभे न करता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला, पण युती झाली नाही.

(हेही वाचा – Israel attacks Iran : इस्राइलच्या हल्ल्यात इराणचे अनेक वरिष्ठ सैन्य अधिकारी, परमाणु शास्त्रज्ञ ठार)

आज मात्र परिस्थिती वेगळी आहे. त्या वेळी मनसेविरोधात उभी असलेली शिवसेना आता भाजपासोबत नाही. उलट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना, मनसेला महायुतीत सामावून घेण्यास उत्सुक आहे. भाजपासह इतर घटक पक्षही सकारात्मक आहेत. त्यामुळेच आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपा-मनसे (BJP-MNS) युती प्रत्यक्षात आली, तर त्याचा थेट फायदा महायुतीला होईल, असा विश्वास राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.