Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी ! एक फोन आला आणि इमर्जन्सी लँडिंग …

Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी ! एक फोन आला आणि इमर्जन्सी लँडिंग ...

155
Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी ! एक फोन आला आणि इमर्जन्सी लँडिंग ...
Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी ! एक फोन आला आणि इमर्जन्सी लँडिंग ...

अहमदाबादच्या भीषण विमान दुर्घटनेच्या दुसऱ्याच दिवशी एअर इंडियाच्या (Air India) आणखी एका फ्लाइटमध्ये मोठा हादरून टाकणारा प्रसंग घडला. थायलंडच्या फुकेतहून दिल्लीला जाणाऱ्या AI 379 या एअर इंडिया विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली. त्यामुळे तातडीने आपत्कालीन लँडिंग करावं लागलं. या प्रसंगामुळे १५६ प्रवाशांमध्ये घबराटचं वातावरण निर्माण झालं. (Air India)

हेही वाचा-Ahmedabad Plane Crash दुर्घटनेतून बचावलेल्या प्रवाशाची पंतप्रधानांकडून विचारपूस ; रमेश विश्वकुमार म्हणाला, “मी विमानातून उडी घेतली नाही, तर…”

धमकी मिळाल्यानंतर विमानाचे थायलंडमध्ये आपत्कालीन लँडिंग करावे लागले. या विमानातील 156 प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. विमानाने अंदमान समुद्रावर चक्कर मारल्यानंतर फुकेत विमानतळावर परत लँडिंग केले. धमकी देणाऱ्याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. (Air India)

हेही वाचा- Ahmedabad Plane Crash : हॉस्टेलवर विमान कोसळल्याने एकच हल्लकल्लोळ ; शिकाऊ डॉक्टरांनी मारल्या इमारतीतून उड्या

बॉम्ब अलर्ट मिळताच फ्लाइट क्रूने तात्काळ SOP (Standard Operating Procedure) लागू करत प्रत्येक प्रवाशाला सुरक्षितरित्या खाली उतरवलं. विमानतळ प्रशासन, बॉम्ब स्क्वॉड आणि सुरक्षा यंत्रणांनी विमानाची बारकाईने तपासणी सुरू केली आहे. अद्याप धमकी देणाऱ्याचं नेमकं स्रोत किंवा हेतू स्पष्ट झालेला नाही. (Air India)

हेही वाचा- Israel attacks Iran : इस्त्रायलच्या हल्ल्याने इराण हादरलं ! लष्करी आणि अण्वस्त्र तळांना केलं लक्ष्य

एक अधिकाऱ्याने सांगितले की, फ्लाइट AI 379 लँड झाले आहे आणि विमानतळ आपत्कालीन सेवेसह पुढील कार्यवाही करत आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, थाई बेट फुकेतहून दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला शुक्रवारी बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली होती. माहिती मिळताच तात्काळ आपत्कालीन लँडिंग करवण्यात आले. (Air India)

हेही वाचा- Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघात की घातपात? काय म्हणतात तज्ज्ञ?

एअर इंडियाने अधिकृत निवेदनामध्ये प्रवाशांना शांतता आणि संयम राखण्याचे आवाहन केले आहे. “प्रत्येक प्रवाशाचं आणि कर्मचाऱ्याचं रक्षण हे आमचं सर्वोच्च प्राधान्य आहे,” असं कंपनीने स्पष्ट केलं आहे. (Air India)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.