अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान आज गुरूवारी दुपारी उड्डाणानंतर कोसळले आहे. या विमानात २३० प्रवाशांसह १२ क्रु मेंबर्स प्रवास करत होते. या दुघटनेत सर्व प्रवाशांसह ज्या ठिकाणी विमान कोसळले त्या परिसरातील काही लोकांचा मृत्यू झाला. यात विमानात बसलेले सोलापूर जिल्ह्यात असलेल्या सांगोला तालुक्यातील हातीद गावातील दोघांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. (Ahmedabad plane crash)
महादेव तुकाराम पवार व आशाबेन महादेव पवार अशी मृत पती-पत्नींची नावे आहेत. त्यांना दोन मुले आहेत. एक मुलगा लंडनमध्ये असून दुसरा मुलगा गुजरातमध्ये चालक म्हणून काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. ते दोघे लंडनमधील मुलाचा व्यवसाय पाहण्यासाठी निघाले होते. मात्र, मुलाचा व्यवसाय पाहण्याची त्यांची इच्छा अधुरी राहिली आहे.
गुरूवारी दुपारी महेश पवार हे नातेवाईक विमानतळावर महादेव व आशाबेन यांना सोडायला गेला होता. सोडून बाहेर आल्यावर विमान अपघाताची माहिती कळाली अन् त्याने कुटुंबियांना माहिती दिली.
“मी विमानातून उडी घेतली नाही…”
या अपघातात बचावलेला एक प्रवासी रमेश विश्वकुमार हे 40 वर्षांचे आहेत. त्यांनी या घटनेची माहिती देताना म्हटलं की, “विमानानं टेकऑफ घेतल्यानंतर 30 सेकंदात मोठा आवाज सुरु झाला अन् विमान क्रॅश झालं, हे खूप वेगानं घडलं. 11A सीट विमानाच्या दरवाजाजवळ होती. एअर इंडियाच्या विमानाच्या पुढच्या भागात बिझनेस क्लास आहे. त्यानंतर इकॉनॉमी क्लासच्या सीट्स आहेत. मी विमानातून उडी घेतली नाही, तर मी सीटसह बाहेर फेकला गेलो.” अशी माहिती रमेश विश्वकुमार यांनी दिली. (Ahmedabad Plane Crash)
विमानतळावर उच्चस्तरीय बैठक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वप्रथम दुर्घटनास्थळाची पाहणी केली असून या घटनेची माहिती घेतली. त्यानंतर ते रुग्णालयात जाऊन जखमींना भेटले, त्यांच्याशी संवाद साधला. पाठोपाठ या भेटीनंतर पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत विमानतळावर उच्चस्तरीय बैठक सुरू झाली आहे. पंतप्रधान मोदी या दुर्घटनेचा आढावा घेत आहेत. मोदी गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या परिवाराची भेट घेणार आहेत. (Ahmedabad Plane Crash)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community