दैनंदिन जीवनात एआय (Ashadhi Wari 2025) तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे. एआय तंत्रज्ञानाचा वापर आता पंढरपूरातील आषाढी वारीदरम्यान (Ashadhi Wari 2025) करण्यात येणार आहे. या माध्यमातून लोकसंख्या मोजली जाणार आहे. तसेच इतर ठिकाणी गुन्हे केलेल्या गुन्हेगारांचा चेहरा या माध्यमातून तपासला जाणार आहे. यातून ज्या ठिकाणी गर्दी होणार त्या ठिकाणचा सतर्कतेचा इशारा नियंत्रण कक्षाला मिळणार आहे, अशी माहिती सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिली आहे. (Ashadhi Wari 2025)
हेही वाचा-बियाणे ठेवले म्हणून पोलिसांचा छापा? Sadabhau Khot संतप्त; मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून कारवाईची मागणी
देहू येथून संत तुकाराम महाराज व आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखीचे १९ जून रोजी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान होणार आहे. लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत पालखी दरवर्षी पंढरपूरला शिस्तबद्ध पद्धतीने जात असते. नेमके वारी मध्ये किती वारकरी सहभागी होतात याबाबतची प्रत्येक व्यक्तीची नोंद तसेच दिंडया सोबतच्या वाहनांची संख्या याची देखील नोंद होणार असल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्तांनी एका वृत्तवाहिनीसोबत बोलताना दिली आहे. (Ashadhi Wari 2025)
हेही वाचा- जाणून घ्या कॅनबेरीमध्ये कोणते-कोणते फायदे आहेत?
आषाढी वारीला लाखो लोक येतात. हजारो दिंड्या आणि त्यांची वाहने, एसटी बसेस, खासगी वाहन याचे नियोजन केले जाते. पोलीस प्रशासन मागील वारीतील अनुभव लक्षात घेऊन अधिकच्या सुविधा देण्याचा प्रयत्न करत असते. यंदा पोलीस प्रशासनाकडून प्रयागराजच्या धर्तीवर ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. वारीला किती लोक येतात, याची मोघम माहिती किंवा अंदाजे आकडेवारी काढली जाते. मात्र आता ड्रोनच्या माध्यमातून याचा वापर केला जाणार आहे. (Ashadhi Wari 2025)
हेही वाचा- State Government : चेंबूर येथील शासकीय वसतिगृहाकरिता २ कोटी ८१ लाखांचा निधी खर्च करणार
शहरातील एका भागात किती नागरिक आहेत याचे मोजमाप या माध्यमातून केले जाणार आहे. जवळपास ७० ते ८० टक्के अचूकता यात असल्याची माहिती कुलकर्णी यांनी दिली आहे. तसेच राज्यातून काही खिसेकापू,चोरी, दरोडे असे विविध गुन्हे केलेले गुन्हेगार यात्रेत येतात. त्यांचा चेहरा शोधण्यास याची मदत मिळू शकणार आहे. आषाढी यात्रापूर्व नियोजनासाठी पोलीस अधीक्षक येथे आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि माहिती दिली. (Ashadhi Wari 2025)
शहरात विविध ठिकाणी २५० ‘सीसीटीव्ही कॅमेरे’ असून याला सदर नवीन तंत्रज्ञान जोडले जाणार आहे. या साठी नियंत्रण कक्ष उभारण्यात आला आहे. या ठिकाणाहून वारी संदर्भातील अनेक सूचना शहरातील पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना देण्याची व्यवस्था केली आहे. या शिवाय वाहतूक व्यवस्थेबाबत देखील याचा वापर करून जर वाहतूक खोळंबली तर ती सुरळीत करणे, वाहतूक अन्य मार्गावरून वळवणे यासारख्या पर्यायाचा वापर करता येईल. (Ashadhi Wari 2025)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community