जयपूरमध्ये ट्रक आणि जीप यांच्यात झालेल्या धडकेत वधू-वरासह ५ जणांचा मृत्यू (Accident News) झाला आहे. तर ६ वऱ्हाडी जखमी झाले. ही धडक इतकी भीषण होती की जीप चक्काचूर झाली. मृतदेह वाहनात अडकले होते. खूप प्रयत्नांनंतरच त्यांना बाहेर काढता आले. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, दोन्ही वाहनांची समोरासमोर टक्कर झाली. (Accident News)
हेही वाचा-Government controls AC cooling : तुमच्या ‘एसी’च्या कूलिंगवर आता सरकारचा वॉच !
बुधवारी सकाळी ६:१० वाजता दौसा-मनोहरपूर महामार्गावर (एनएच-१४८) रायसर (जयपूर ग्रामीण) परिसरातील भटकबास गावाजवळ हा अपघात झाला. जीपमधील लोक लग्न समारंभाला उपस्थित राहून मध्यप्रदेशहून परतत होते. जखमींना निम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Accident News)
हेही वाचा- 11th admission : अकरावी प्रवेशाच्या वेळापत्रकात पाचव्यांदा बदल! आता २६ जूनला पहिली यादी जाहीर होणार
स्थानिक लोकांकडून माहिती मिळताच पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले. लोकांच्या मदतीने मृतदेह गाडीतून बाहेर काढण्यात आले. अपघातानंतर महामार्गावर जाम झाला आणि गोंधळ उडाला. वऱ्हाडींची जीप मध्यप्रदेशहून मनोहरपूरला जात होती. जखमींचे जबाब घेतले जात आहेत. त्यानंतर कुटुंबातील सदस्यांना माहिती दिली जात आहे. काही गंभीर जखमींना एनआयएमएस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Accident News)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community