‘ऑपरेशन सिंदूर हा भारताच्या सुरक्षा यंत्रणेत बदल घडवून आणल्याचा पुरावा’; संरक्षणमंत्री Rajnath Singh यांचा पुनरुच्चार

Rajnath Singh : ऑपरेशन सिंदूर हा भारताच्या सुरक्षा यंत्रणेत बदल घडवून आणल्याचा पुरावा आहे, असे विधान केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह(Rajnath Singh) यांनी केले. ऑपरेशन सिंदूर हे भारतीय इतिहासातील दहशतवादाविरुद्धची सर्वात मोठी कारवाई असल्याचे वर्णन संरक्षणमंत्री सिंह(Rajnath Singh) यांनी केले.

147

Rajnath Singh : ऑपरेशन सिंदूर हा भारताच्या सुरक्षा यंत्रणेत बदल घडवून आणल्याचा पुरावा आहे, असे विधान केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह(Rajnath Singh) यांनी केले. ऑपरेशन सिंदूर हे भारतीय इतिहासातील दहशतवादाविरुद्धची सर्वात मोठी कारवाई असल्याचे वर्णन संरक्षणमंत्री सिंह(Rajnath Singh) यांनी केले. दरम्यान, पहलगाममधील निष्पाप पर्यटकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून करण्यात आल्याचेही मंत्री सिंह यांनी सांगितले.(Rajnath Singh)

(हेही वाचा Punjab मध्ये खलिस्तानी कारवायांना ऊत; बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची तोडफोड )

ते पुढे म्हणाले, यंदा १.७५ लाख कोटी रुपयांचे संरक्षण उत्पादन व ३० हजार कोटी रुपयांचे संरक्षण निर्यातीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. गेल्या ११ वर्षांत केंद्र सरकारने राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित प्रत्येक मुद्द्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून भारताच्या सुरक्षा यंत्रणेत बदल घडवून आणला आल्याचेही संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले. दरम्यान, उत्तराखंडमधील देहरादून येथे आयोजित ‘राष्ट्रीय सुरक्षा आणि दहशतवाद’ या विषयावर केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह(Rajnath Singh) बोलत होते.

(हेही वाचा Supreme Court : ‘व्यवसाय सुरू करण्याप्रमाणेच बंद करण्याचाही अधिकार संविधान देतं’; साखर कारखाना प्रकरणात महत्त्वपूर्ण टिप्पणी )

ऑपरेशन सिंदूरबाबत बोलताना मंत्री राजनाथ सिंह(Rajnath Singh) म्हणाले, गेल्या ११ वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित प्रत्येक मुद्द्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि कृतीतून भारताच्या सुरक्षा यंत्रणेत बदल घडवून आणला आहे. ऑपरेशन सिंदूर दरम्यान जगाने हा बदल पाहिल्याचा पुनरुच्चार संरक्षणमंत्री म्हणाले. ते पुढे म्हणाले, भारतीय सशस्त्र दलांनी दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले असले तरी, भविष्यात पहलगाममधील दहशतवादी घटना रोखणे अत्यंत आवश्यक आहे, असेही राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले.(Rajnath Singh)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.