मुंब्रा दुर्घटनेनंतर मी केंद्रिय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav) यांच्याशी दीर्घ चर्चा केली आहे. प्रवासी सुरक्षिततेसाठी लोकलला बंद होणारे दरवाजे लावण्याचा विचार सुरू आहे. सोबतच एसी ट्रेन वाढविण्यात येणार आहेत त्या देखील भाडेवाढ न करता यावर देखील विचार सुरू आहे. काल जे घडले त्यातून निश्चितच बोध घ्यावा लागेल. केंद्र आणि राज्य सरकार मिळून याबाबत योजना आखेल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडावीस (CM Devendra Fadnavis) यांनी दिली. भारत निवडणूक आयोगाने याआधीच निवडणूकीसंदर्भात काँग्रेस पक्षाला माहिती अधिकार कायदयांतर्गत ६० पानी उत्तर दिले आहे. त्यात जर विसंगती असतील तर त्या राहुल गांधी यांनी दाखवून दयाव्यात असे माझे त्यांना आव्हान असल्याचेही फडणवीस म्हणाले. दोन राष्ट्रवादी एकत्र होणार की नाही हे तेच सांगू शकतात, त्यांच्या मनात काय चालले आहे. हे जाणून घेण्याची शक्ती माझ्याकडे नाही असेही ते म्हणाले. केंद्रातील मोदी सरकारच्या तिस-या पर्वाच्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने आयोजित पत्रकारपरिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. (CM Devendra Fadnavis)
(हेही वाचा – भाडेवाढ न करता एसी ट्रेन वाढविण्याचा विचार; CM Devendra Fadnavis यांचे विधान)
मतदानात घोळ झाला असे राहुल गांधींचे (Rahul Gandhi) म्हणणे असेल तर त्यांनी तसे भारत निवडणूक आयोगाला (Election Commission of India) पत्र दयावे. पण ते देणार नाहीत. कारण माहितीच्या अधिकारात त्यांनी आधीच ही माहिती घेतली आहे. आयोगाने त्यांना ६० पानी उत्तर दिले आहे. त्यात जर विसंगती असतील तर त्या राहुल गांधींनी दाखवून दयाव्यात असे आव्हान मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
(हेही वाचा – ‘पाकिस्तानात दहशतवादी जितके आत असतील तितके आत घुसू’; परराष्ट्रमंत्री S Jaishankar यांचा स्पष्ट इशारा)
हेही पहा –