BMC : दांडीबहाद्दर सफाई कामगारांवर आता वॉच; ४५ पेक्षा अधिक दिवस गैरहजर राहिल्यास होणार कारवाई

14747
BMC : दांडीबहाद्दर सफाई कामगारांवर आता वॉच; ४५ पेक्षा अधिक दिवस गैरहजर राहिल्यास होणार कारवाई
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई 

स्वच्छतेसंदर्भातील अभियानाने प्रोत्साहन मिळत असले तरी नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जागरुकता निर्माण होणेही तितकेच महत्वाचे आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागात कार्यरत असलेले स्वच्छता कर्मचारी नियमितपणे त्यांची जबाबदारी पार पाडत असल्याची खात्री संबंधित अधिकाऱ्यांनी करावी. तरीही, ४५ दिवसांपेक्षा अधिक कालावधीपासून एखादा कर्मचारी कायमस्वरुपी गैरहजर असल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करावी.असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी दिले आहेत. दरम्यान कनिष्ठ अभियंत्यांना सचेत ऍपचा वापर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. (BMC)

घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात शहर विभागातील सर्व प्रशासकीय विभागांच्या कामगिरीचा डॉ. जोशी यांनी परळ येथील महापालिकेच्या एफ (दक्षिण) विभाग कार्यालयात आयोजित बैठकीत मंगळवार (दिनांक १० जून २०२५) आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. उपायुक्त (परिमंडळ-१) डॉ. संगीता हसनाळे, उपायुक्त (परिमंडळ-२) प्रशांत सपकाळे, उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर, शहर विभागातील सर्व प्रशासकीय विभागांचे (वॉर्ड) सहायक आयुक्त तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागाचे अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते. (BMC)

(हेही वाचा – Austria School Firing : ऑस्ट्रेलिया येथील एका शाळेत अंदाधुंद गोळीबार, ११ विद्यार्थ्यांचा मृत्यू; नेमकं प्रकरण काय ?)

आढावा घेतल्यानंतर अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी म्हणाल्या, स्वच्छतेसंदर्भात आयोजित एखाद्या अभियानात मोठ्या प्रमाणात कचरा संकलित होत असेल तर नियमितपणे देखील तितक्याच कचऱ्याचे संकलन व्हायला हवे. स्वच्छतेसंदर्भातील अभियानाने प्रोत्साहन मिळत असले तरी नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जागरुकता निर्माण होणेही तितकेच महत्वाचे आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागात कार्यरत असलेले स्वच्छता कर्मचारी नियमितपणे त्यांची जबाबदारी पार पाडत असल्याची खात्री संबंधित अधिकाऱ्यांनी करावी. तरीही, ४५ दिवसांपेक्षा अधिक कालावधीपासून एखादा कर्मचारी कायमस्वरुपी गैरहजर असल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करावी. (BMC)

सहायक मुख्य पर्यवेक्षक, कनिष्ठ अभियंता आदींनी ‘सचेत’ अॅपचा नियमितपणे वापर करावा. तसेच, संबंधित प्रशासकीय विभागाच्या सहायक आयुक्त यांनी आपापल्या भागातील घनकचराविषयक गरजा, मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होणारी ठिकाणे आणि नागरिकांच्या वर्दळीच्या वेळा लक्षात घेऊन आवश्यकतेनुसार नियोजनासाठी सूक्ष्म आराखडा सादर करावा, असे निर्देशही डॉ. अश्विनी जोशी यांनी यावेळी दिले. प्रत्यक्ष कार्यक्षेत्रावर (ऑन फिल्ड) कार्यरत असलेले सहायक मुख्य पर्यवेक्षक, कनिष्ठ अभियंता यांनी त्यांच्या अधिकारक्षेत्रातील परिसरात नियमितपणे परिक्षण करावे. तसेच, कुठेही कचरा आढळणार नाही, याची काळजी घ्यावी, अशी सूचना उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर यांनी केली. (BMC)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.