परदेशातून परतलेले शिष्टमंडळ संध्याकाळी PM Narendra Modi यांच्या भेटीला, बैठकीपूर्वी करावी लागणार कोविड चाचणी

59
मंगळवारी संध्याकाळी सर्वपक्षीय शिष्टमंडळ (Indian delegation team)  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिल्ली येथील ७ लोक कल्याण मार्ग येथील सरकारी निवासस्थानी भेटणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिष्टमंडळातील सदस्यांची कोविड-१९ चाचणी करणे बंधनकारक असेल. सुरक्षा प्रोटोकॉल अंतर्गत हे पाऊल उचलण्यात आले आहे. (PM Narendra Modi)

(हेही वाचा – Mumbra Train Accident : राज्य सरकारचा मोठा निर्णय; लोकलमधील गर्दीवर नियंत्रणासाठी सरकारी कार्यालयांची वेळ बदलणार)

मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी मंगळवारी संध्याकाळी ७:३० वाजता ऑपरेशन सिंदूर अंतर्गत परदेशात भारताचा संदेश पोहोचवणाऱ्या शिष्टमंडळांच्या नेत्यांना भेटतील. या दरम्यान, पंतप्रधान शिष्टमंडळाचे अनुभव आणि अभिप्राय घेतील. याशिवाय, पंतप्रधान मोदी यांच्याकडून सर्व खासदारांसाठी रात्रीचे जेवण देखील आयोजित करण्यात आले आहे.

या शिष्टमंडळाला विशेषतः पाकिस्तानमधील दहशतवाद जगासमोर उघड करण्याचे काम देण्यात आले होते. सात प्रमुख खासदारांना टीम लीडचे काम देण्यात आले होते, ज्यामध्ये शशी थरूर (काँग्रेस), रविशंकर प्रसाद (भाजपा), संजय कुमार झा (जेडीयू), बैजयंत पांडा (भाजपा), कनिमोझी करुणानिधी (द्रमुक), सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी शप) आणि शिवसेनेचे श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांचा समावेश आहे.

काँग्रेस खासदार शशी थरूर (Shashi Tharoor) यांच्या नेतृत्वाखाली खासदारांचा एक गट अमेरिकेला गेला. या भेटीदरम्यान विविध देशांमध्ये भारतीय दृष्टिकोन जोरदारपणे मांडण्यात आला. काँग्रेसचे शशी थरूर यांच्याव्यतिरिक्त, शिष्टमंडळात झारखंड मुक्ती मोर्चाचे (जेएमएम) सरफराज अहमद, तेलगू देसम पक्षाचे (टीडीपी) गंटी हरीश मधुर बालयोगी, भारतीय जनता पक्षाचे (भाजपा) शशांक मणी त्रिपाठी, भुवनेश्वर कलिता, शिवसेनेचे मिलिंद देवरा आणि भाजपाचे तेजस्वी सूर्या यांचा समावेश होता.

(हेही वाचा – Mumbra Train Accident : राज्य सरकारचा मोठा निर्णय; लोकलमधील गर्दीवर नियंत्रणासाठी सरकारी कार्यालयांची वेळ बदलणार)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलावलेल्या उच्चस्तरीय बैठकीला तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) खासदार अभिषेक बॅनर्जी देखील उपस्थित राहणार आहेत. तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी हे जपान आणि इतर अनेक आशियाई देशांना भेट दिलेल्या शिष्टमंडळाचा भाग होते. तसेच ५० हून अधिक सदस्यांच्या सहभाग असलेल्या या ७ शिष्टमंडळांचे उद्दिष्ट हे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाबाबत भारताची ठाम भूमिका मांडण्याची जबाबदारी होती. यामध्ये बहुतेक विद्यमान खासदारांचा समावेश होता.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.