S Jaishankar : ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे कंबरडे मोडल्यानंतर भारताने दहशतवादाविरोधात भूमिका वेळोवेळी जाहीर केली आहे. त्यातच आता परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर(S Jaishankar) यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानातील दहशतवाद्यांना स्पष्ट इशारा दिला आहे. दहशतवादी पाकिस्तानात कुठेही असोत, भारत दहशतवादाला चोख प्रत्युत्तर देईल, असा पुनरुच्चार एस. जयशंकर(S Jaishankar) यांनी केला. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर(S Jaishankar) यांनी युरोपियन युनियनसोबत उच्चस्तरीय व्यापार चर्चेसाठी ब्रुसेल्सला भेट दिली असताना POLITICO ला दिलेल्या मुलाखतीत विविध विषयांवर भाष्य केले.(S Jaishankar)
(हेही वाचा कोरोनाची उत्पत्ती झालेल्या चीनी लॅबमधील संशोधकाला FBI ने केली अटक; तपासणीत धक्कादायक बाब उघड )
दरम्यान, भारत-पाकिस्तान यांच्यातील लष्करी संघर्षानंतर भविष्यातील दहशतवादी कारवायांबाबत इशारा देताना एस. जयशंकर म्हणाले, पाकिस्तानातील दहशतवादी लक्ष्य कितीही किमी दूरवर असले तरी भारत जशास तसे उत्तर देण्यास मागेपुढे पाहणार नाही, असेही जयशंकर यांनी सांगितले. पाकिस्तान सरकारी धोरणाप्रमाणे दहशतवादाचा वापर करत असून त्याचा वापर करण्यात गुंतलेला आहे, अशा शब्दांत एस. जयशंकर(S Jaishankar) यांनी पाकिस्तानला फटकारले आहे.
(हेही वाचा Operation Sindoor वरून रडगाणे गाताना पाकड्यांचा अमेरिकेत कबूलनामा; भारताकडून सर्व शक्तीनिशी हल्ला )
ऑपरेशन सिंदूरबाबत बोलताना एस. जयशंकर(S Jaishankar) म्हणाले, भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांना लक्ष्य केले. तसेच, लष्करी हल्ले केल्यानंतर पाकिस्तानने भारतावर केलेल्या अयशस्वी ड्रोन व क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे हा संघर्ष झाल्याचे एस. जयशंकर म्हणाले. जर ते(दहशतवादी) खोलवर असतील तर आम्ही खोलवर जाऊ, असा कडक इशारा देतानाच दहशतवादाविरोधातील कुठल्याही कारवायांना चोख प्रत्युत्तर देण्यास भारत मागेपुढे पाहणार नाही, असेही एस. जयशंकर यांनी स्पष्ट केले.(S Jaishankar)
Join Our WhatsApp Community