वर्ध्याच्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयात Veer Savarkar यांचा अवमान; सावरकरप्रेमींकडून पोलिसांकडे कारवाईची मागणी

Veer Savarkar यांची बदनामी करणाऱ्यांना कठोर शासन झाले पाहिजे !

110

सध्या मोदी सरकारने नक्षलवादी चळवळीचे समूळ उच्चाटन करण्याचा निर्णय घेतला आहे. २६ मार्च २०२६ पर्यंत देशभरातून नक्षलवाद संपवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच बरोबर शहरी नक्षलवादही संपवला जात आहे. मात्र तरीही शाळा-महाविद्यालयात शहरी नक्षलवादी विचार अद्याप जिवंत आहेत. याचा प्रत्यय वर्ध्यात (Wardha) आला आहे. या ठिकाणी महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयात (Mahatma Gandhi Antarrashtriya Hindi VishwaVidyalaya) विद्यार्थ्यांनी शहरी नक्षलवादी संघटना कबीर कला मंचप्रमाणे देशविरोधी गाणे गायले आहे. त्यात विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य चळवळीत सशस्त्र क्रांतिकारकांचे स्फूर्ती स्थान बनलेले वीर सावरकर यांच्यावर टीका करणारे त्यांचा अवमान करणारे गाणे गायले आहे. (Veer Savarkar)

(हेही वाचा – Football World Cup पात्रता सामन्यात बेल्जियमची वेल्सवर मात)

हा संतापजनक प्रकार समोर आल्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर सामाजिक सेवा भक्त मंडळाने वर्धा येथे पोलिसांना निवेदन दिले आहे. या निवेदनाद्वारे संबंधितांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, सामाजिक माध्यमांवर स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी करणारा व्हिडिओ (एस .एफ. ई.) स्टुडन्ट फेडरेशन ऑफ इंडियाद्वारे (Student Federation of India) मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहे. इन्स्टाग्राम आणि अन्य प्रसारमाध्यमांद्वारे जाणीवपूर्वक केला जाणारा हा प्रसार एक सामाजिक अपराध आहे. कोणत्याही राष्ट्रभक्ताची बदनामी करणे हा कायदेशीर अपराध असल्याचा निर्णय नुकताच उच्च न्यायालयाने दिलेला असल्याने अशी स्वातंत्र्यवीर सावरकरांची बदनामी करून समाजात जाती जाती, तसेच सामाजिक स्तरावर तेढ निर्माण करून दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांच्या विरोधात कठोर शासन होणे अत्यावश्यक आहे.New Project 52 2

स्वातंत्र्यवीर सावरकर सामाजिक सेवा समितीकडून याचा निषेध‌ करण्यात आला असून या घटनेकडे दुर्लक्ष केल्यास संपूर्ण महाराष्ट्रात स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य अभ्यासक, भक्त आणि संस्थाचे जनआंदोलन उभारण्यात येईल. राष्ट्रद्रोही आणि जातीजाती तेढ निर्माण करून सामाजिक अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांच्या विरोधात एफआयआर दाखल करून त्यांना कठोर शिक्षा देण्याची मागणी यात करण्यात आली आहे.

पोलीस अधीक्षक जैन यांनी हे निवेदन स्वीकारले. हे निवेदन देतेवेळी शिष्टमंडळात विश्व हिंदू परिषदेचे मंत्री अनिल कावळे, अतुल देशपांडे, स्वातंत्र्यवीर सावरकर समितीचे अध्यक्ष श्याम देशपांडे, संस्कार भारतीचे जिल्हा सचिव मकरंद उमाळकर, विवेक विचार मंच प्रांत संयोजक अतुल शेंडे, विश्व हिंदी विद्यापिठाचे डॉ. अश्विन कुमार, शुभम चिखलकर, पुरोहित मंडळाचे सचिन लिखितकर हे उपस्थित होते. या व्यतिरिक्त रवी सातदेवे, अनिल पाखोडे, कुमार लिखितकर भाजपाचे श्रीधर देशमुख आदी विविध संघटनांचे सदस्य आणि पदाधिकारी निवेदन देताना उपस्थित होते.

गीताद्वारे वीर सावरकर आणि रा. स्व. संघाचाही अवमान

महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी एक गाणे तयार केले असून ते त्यांनी समूहिकपणे गायले. ‘सॉरी सावरकर’ या गाण्यामध्ये वीर सावरकरांनी भीतीपोटी ब्रिटिशांकडे सुटकेसाठी माफीनामा लिहून दिला, अशा आशयावर हे गाणे आहे. याच गाण्यामध्ये ‘शाळा या संघाच्या शाखा नाहीत. तिथे सावित्रीबाईंचे स्मरण व्हावे, असे एक कडवे घालून उभ्या देशात निःस्वार्थ सेवाभावाने राष्ट्र उभारणीच्या कार्यात मोलाचे योगदान असणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही टीका करण्यात आली आहे. अशा प्रकारे या विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर आणि रा. स्व. संघाची (RSS) थट्टा करण्याचा घृणास्पद प्रकार केला आहे. त्यामुळे विद्यार्थी वर्गात शहरी नक्षलवादी विचारधारा, तुकडे तुकडे गँग अजूनही जिवंत असल्याचे प्रमाण मिळाले आहे.  (Veer Savarkar)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.