Manipur Violence : पुन्हा हिंसक आंदोलने; मणिपूरला अशांत करण्याचा कोणाचा प्रयत्न ?

65

मे २०२३ मध्ये हिंसाचार झाल्यानंतर मणिपूरमध्ये गेल्या दोन वर्षांपासून थोडीफार शांतता होती. (Manipur Violence) जाळपोळ व दगडफेकीच्या घटना फारशा समोर येत नव्हत्या. नुकतेच मैतई समाजाची संघटना असलेल्या ‘अराम्बाई टेंगल’च्या नेत्याला अटक झाल्यानंतर आणि इतर काही सदस्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर राज्यात पुन्हा हिंसक आंदोलनाला सुरुवात झाली आहे.

(हेही वाचा – Rafael Nadal च्या २०१७ फ्रेंच ओपन फायनलच्या रॅकेटला विक्रमी किंमत)

मणिपूरमध्ये २०२३ मध्ये झालेल्या हिंसाचाराशी संबंधित विविध गुन्हेगारी कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपावरून रविवार, ८ जून या दिवशी इम्फाळ विमानतळावर अराम्बाई टेंगल संघटनेच्या (Arambai Tangle Association) कन्नन सिंग या आरोपीला अटक करण्यात आली. नंतर त्याला गुवाहाटी (Guwahati) येथे नेण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार मणिपूरमधील संघर्षाशी संबंधित खटले गुवाहाटीत चालवले जात आहेत. कन्नन सिंग हा मणिपूर पोलिसांच्या (Manipur Police) कमांडो युनिटमधील निलंबित हेड कॉन्स्टेबल असल्याचे सांगितले जाते. त्याच्यावर आदिवासी अल्पसंख्यांकांविरोधात गंभीर गुन्हे केल्याचा आरोप आहे. या अटकेनंतर मणिपूरमध्ये अस्थैर्याची स्थिती निर्माण झाली असून, पुन्हा हिंसाचार उसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

हिंसक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आत्मदहनाच्या धमक्या व संपूर्ण बंदची शक्यता लक्षात घेता, प्रशासनाने परिस्थिती गांभीर्याने घेतली आहे. राज्यात निदर्शक रस्त्यावर उतरू नयेत; म्हणून प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले असून, सर्व इंटरनेट सेवांवर पाच दिवसांची बंदी घालण्यात आली आहे. (Manipur Violence)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.