रेल्वे स्थानकांवरील स्टॉल्स आठ दिवसांत हटवा, अन्यथा कारवाई करु ; Avinash Jadhav यांचा इशारा

रेल्वे स्थानकांवरील स्टॉल्स आठ दिवसांत हटवा, अन्यथा कारवाई करु ; Avinash Jadhav यांचा इशारा

113
रेल्वे स्थानकांवरील स्टॉल्स आठ दिवसांत हटवा, अन्यथा कारवाई करु ; Avinash Jadhav यांचा इशारा
रेल्वे स्थानकांवरील स्टॉल्स आठ दिवसांत हटवा, अन्यथा कारवाई करु ; Avinash Jadhav यांचा इशारा

मुंब्रा स्थानकाजवळ सोमवारी घडलेल्या भीषण अपघाताच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आज ठाण्यात रेल्वे प्रशासनाविरोधात धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चादरम्यान मनसेने रेल्वे स्थानकांवरील वडापाव व पेपर स्टॉल्स आठ दिवसांत हटवण्याची मागणी केली आहे. अन्यथा मनसेच्या वतीने थेट कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. या मोर्चाचे नेतृत्व मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांनी केले आहे.

हेही वाचा-Hepatitis in Kerala : केरळमध्ये कोरोनानंतर आता हेपेटायटीसच्या रुग्णांमध्ये वाढ

मोर्चा गावदेवी मैदानातून सुरु होऊन ठाणे रेल्वे स्थानकावर संपला. मोर्चात मनसे कार्यकर्त्यांसह ठाणेकर नागरिक आणि अनेक रेल्वे प्रवासी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रेल्वे स्थानक परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मोर्चानंतर रेल्वे अधिकाऱ्यांची भेट घेत मनसे प्रतिनिधींनी प्रवासी सुरक्षेच्या दृष्टीने काही ठळक मागण्या लेखी स्वरूपात सादर केल्या. (Avinash Jadhav)

हेही वाचा- देशात Corona च्या सक्रिय रुग्णांची संख्या सात हजारांवर ! गेल्या २४ तासांत तिघांचा मृत्यू

अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांनी यावेळी बोलताना सांगितले, “दररोज सरासरी २० प्रवासी रेल्वे अपघातात प्राण गमावत आहेत. गेल्या १५ वर्षांत तब्बल ५१ हजार प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तरीही रेल्वे प्रशासन बेफिकीर आहे. तीन महिन्यांपूर्वी संभाव्य अपघाताचा इशारा देणारे पत्र सादर केल्यानंतरही त्यावर कुठलीही कारवाई झाली नाही.”

मनसेच्या प्रमुख मागण्या : (Avinash Jadhav)

  • प्रवाशांच्या संख्येनुसार गाड्यांची संख्या आणि आसन क्षमतेचा तपशील सादर करावा.
  • दिवा–सीएसएमटी लोकल सेवा सुरू करण्यात होणाऱ्या अडथळ्यांची माहिती द्यावी.
  • रेल्वे अपघातातील नुकसानभरपाई २५ लाखांपर्यंत वाढवावी.
  • अपघात प्रकरणांवरील निर्णयास होणारा विलंब स्पष्ट करावा.
  • मृत प्रवाशांच्या अपूर्ण भरपाई प्रकरणांची स्थिती जाहीर करावी.
  • एका डब्यात प्रवाशांची मर्यादित संख्या किती असावी, याची स्पष्ट नियमावली द्यावी.
  • रेल्वेचा मासिक ताळेबंद सार्वजनिक करावा.
  • स्वतंत्र ‘मुंबई लोकल बोर्ड’ स्थापन करावा.
  • राज ठाकरे यांच्या सूचनेप्रमाणे चढ-उतारासाठी स्वतंत्र व्यवस्था लागू करावी.
  • फलाटांवरील अनावश्यक स्टॉल्स व जाहिराती हटवाव्यात.
  • फेरीवाल्यांविरोधात कठोर कारवाई करावी.
  • काही डबे वातानुकूलित करण्याची शक्यता तपासावी.

मनसेच्या या आंदोलनामुळे रेल्वे प्रशासनासमोर प्रवासी सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, पुढील काही दिवसांत प्रशासन यावर काय निर्णय घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. (Avinash Jadhav)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.