
मुंबईवरून (Mumbai Railway Accident) कर्जतकडे आणि कसाऱ्याहून मुंबईकडे जाणाऱ्या जलद लोकल ट्रेनच्या दरवाजात लटकणारे प्रवासी परस्परांना धडकल्याने सोमवारी सकाळी मुंब्र्यात झालेल्या भीषण अपघातात (Mumbai Railway Accident) ४ प्रवाशांचा मृत्यू झाला, तर ९ जखमी झाले. काहींची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेत उल्हासनगरचा तरूण केतन सरोजचाही मृत्यू झाला आहे. (Mumbai Railway Accident)
अवघ्या 23 वर्षांचा केतन हा गेल्या तीन महिन्यांपासून ठाण्यात नोकरी करायचा. आई, वडील आणि दोन छोटे भाऊ असं केतनचं कुटुंब. रोजसारखाच केतन कामासाठी घराबाहेर पडला आणि रेल्वे अपघातात (Mumbai Railway Accident) त्याचा मृत्यू झाला. या घटनेने हनुमान नगर परिसरात एकच शोककळा पसरली. या घटनेमुळे केतनची आई-वडील, भाऊ आणि कुटुंबीयांचे अश्रू अनावर झाले होते. केतन सरोज याच्या घरची परिस्थिती अतिशय गरिबीची असताना त्याने आपलं शिक्षण बीकॉम पर्यंत पूर्ण केलं. त्यानंतर त्याला ठाण्यात एका खाजगी कंपनीत सेल्समॅनची नोकरी मिळाली. केतन हा घरातील एकुलता एक कमावणारा मोठा मुलगा होता आणि त्याच्यामुळे घरातील उदरनिर्वाह सुरू होता. परंतु त्याच्या या अपघाती मृत्यूमुळे सरोज कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. (Mumbai Railway Accident)
जखमी प्रवासी
आदेश भोईर (२६, रा. आटगाव, कसारा), रिहान शेख (२६, भिवंडी), तुषार भगत (२२), मनीष सरोज (२६ दिवा साबेगाव, दिवा), मच्छिंद्र गोतारणे (३९, वाशिंद), स्नेहा धोंडे (२१, रा. टिटवाळा), प्रियंका भाटिया (२६ रा. शहाड, कल्याण) या सात जणांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Mumbai Railway Accident)
चिंताजनक
शिवा गवळी (२३), अनिल मोरे (४०). (Mumbai Railway Accident)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community