Mumbai Train Accident : गेल्या २० वर्षात रेल्वे अपघातात ५१ हजार ८०२ जणांनी प्राण गमावले

92
Mumbra Train Accident : 'धीम्या मार्गावर जलद लोकल...'; रेल्वे दुर्घटनेचे खरे कारण आले समोर?
  • प्रतिनिधी 

दिवा आणि मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान झालेल्या रेल्वे अपघातानंतर मुंबईच्या लाईफ लाईनवर मागील २० वर्षांत रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. गेल्या २० वर्षांत मुंबईत रेल्वे अपघातात ५१,८०२ जणांचा मृत्यू झाला असून त्यापैकी पश्चिम रेल्वे २२,४८१ पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेमध्ये २९,३२१ जणांचा मृत्यू झाला आहे. कल्याण, ठाणे, वसई आणि बोरिवली या ठिकाणी सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. (Mumbai Train Accident)

सोमवारी सकाळी ठाण्यातील मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ धावत्या लोकल ट्रेनमधून पडून ५ प्रवाशांचा मृत्यू झाला आणि नऊ जण जखमी झाले. ही ट्रेन कसाराहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ला जात होती. या भीषण घटनेनंतर मुंबईत रेल्वे प्रवासादरम्यान अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्या प्रवाशांची मागील २० वर्षांतील आकडेवारी समोर आली आहे. मागील २० वर्षात रेल्वे अपघातात ५१,८०२ जणांनी आपले प्राण गमावले असून सर्वात अधिक अपघात मध्य रेल्वे मार्गावर झाल्याचे आकडेवातून समोर येत आहे. (Mumbai Train Accident)

(हेही वाचा – Mumbra Train Accident : मुख्यमंत्री फडणवीसांची तात्काळ दखल; अपघाताची चौकशी सुरू, मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत)

गेल्या वर्षी २०२४ मध्ये झालेल्या अपघातात रेल्वेच्या आकडेवारीनुसार, २०२४ मध्ये रुळांवर २,४६८ मृत्यूंपैकी १,१५१ जणांचा रुळ ओलांडताना मृत्यू झाला आणि १३० जणांचा ट्रेनमधून पडून मृत्यू झाला. २०२३ मध्ये मुंबईच्या उपनगरीय रेल्वे ट्रॅकवर एकूण २,५९० जणांचा मृत्यू झाला. सरकारी आकडेवारीनुसार, सरासरी दररोज सात मृत्यू होतात. रेल्वेतून पडून मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या १५९ होती आणि रेल्वे रुळ ओलांडताना मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या ३३३ होती. २०२० मध्ये उपनगरीय रेल्वे मार्गांवर १,११६ लोकांचा मृत्यू झाला आणि ८७८ जण जखमी झाले. (Mumbai Train Accident)

२०१९ : मुंबईच्या रेल्वे पोलीस आयुक्तालयाने २०१९ मध्ये संकलित केलेल्या आकडेवारीनुसार, उपनगरीय नेटवर्कवर २,६९१ जणांचा मृत्यू झाला आणि ३,१९८ जण जखमी झाले.

२०१८ : महाराष्ट्राच्या आर्थिक सर्वेक्षण २०१९-२० नुसार, २०१८ मध्ये २,९८१ जणांचा मृत्यू झाला आणि ३,३४९ जण जखमी झाले.

२०१७ : महाराष्ट्राच्या आर्थिक सर्वेक्षण २०१९-२० मध्ये असे दिसून आले आहे की २०१७ मध्ये ३,०१४ जणांचा मृत्यू झाला आणि ३,३४५ जण जखमी झाले.

(हेही वाचा – Assam Government : अवैध घुसखोरांना मोठा दणका; ७ दशके जुना कायदा पुन्हा वापरात आणणार)

२०१६ : २०१६ मध्ये १,०८४ मृत्यू आणि १,५१७ जखमी झाले.

जानेवारी २०१३ ते ऑगस्ट २०१८ : माहिती अधिकार अर्जात असे आढळून आले आहे की १८,४२३ लोकांचा मृत्यू झाला आणि १८,८४७ लोक जखमी झाले. जानेवारी २०१३ ते ऑगस्ट २०१८ दरम्यान उपनगरीय रेल्वेशी संबंधित अपघातांमध्ये लोक जखमी झाले. माहिती अधिकाराच्या उत्तरात असे म्हटले आहे की २०१३ मध्ये ३,५०६ लोकांचा मृत्यू झाला. २०१४ मध्ये ३,४२३, २०१५ मध्ये ३,३०४, २०१६ मध्ये ३,२०२, २०१७ मध्ये ३,०१४. (Mumbai Train Accident)

२०१० : २०१० मध्ये, लोकल ट्रेनमधून पडून ७३४ लोकांचा मृत्यू झाला.

२००९ : २००९ मध्ये, मुंबईच्या लोकल ट्रेन रेल्वे अपघातांमुळे १,७८२ लोकांचा मृत्यू आणि १,६१४ जण जखमी झाले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.