Batsman Clean Bold But Not Out : गोलंदाजाने दांडी गुल केली तरीही फलंदाज बाद नाही; स्थानिक सामन्यात नेमकं काय घडलं?

Batsman Clean Bold But Not Out : बिग क्रिकेट लीगदरम्यान गुजरातमध्ये हा प्रसंग घडला आहे.

55
Batsman Clean Bold But Not Out : गोलंदाजाने दांडी गुल केली तरीही फलंदाज बाद नाही; स्थानिक सामन्यात नेमकं काय घडलं?
  • ऋजुता लुकतुके

क्रिकेट हा कधी कधी बेभरवशाचा खेळ आहे हे दाखवणारा एक प्रसंग गुजरातमध्ये झालेल्या बिग क्रिकेट लीग दरम्यानचा आहे. चिराग गांधी हा फलंदाज ९८ धावांवर खेळत होता. गोलंदाजाच्या चेंडूवर तो पूर्णपणे चकला आणि चेंडू यष्टीवर जाऊन आदळला. पण, तरीही फलंदाजाला जीवदान मिळालं. याचं कारण, चेंडूमुळे यष्टीला फक्त धक्का बसला आणि बेल थोडीशी हलली. पण, बेल खाली पडली नाही. अशावेळी फलंदाज बाद नसतो असा नियम आहे. त्यामुळे अचूक चेंडूवरही चिराग गांधीला जीवदान मिळालं आणि शतक पूर्ण करण्याची संधीही मिळाली. (Batsman Clean Bold But Not Out)

(हेही वाचा – “कोट्यवधींचा घोटाळा? जलसंपदा खात्यातील इंजिनिअर्सच्या बढत्या-बदल्यांना CM Devendra Fadnavis यांच्याकडून ‘ब्रेक’)

हा विचित्र प्रसंग खरं तर १५ डिसेंबर २०२४ चा आहे. पण, सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. खुशा शर्मा यांनी तो ट्विटरवर शेअर केल्यानंतर काही मिनिटांतच १० लाख लोकांनी हा व्हीडिओ पाहिला आहे. फलंदाजाची प्रतिक्रियाही त्यामुळे गमतीशीर आहे. तर मैदानावरील पंचांना हसू न आवरल्यामुळे ते जोरदार हसताना दिसतात. सुरतमध्ये युपी ब्रिजस्टार्स विरुद्ध एमपी टायगर्स यांच्यातील सामन्यात ही घटना घडली. फलंदाज चिराग गांधीने लगेचच बेल पडली नाही असं म्हणत पंचांकडे दाद मागितली. झेल सुटल्यामुळे अनेकदा फलंदाजांना जीवदान मिळतं. किंवा चेंडू यष्टीला चाटून जातो. पण, यष्टीवर चेंडू लागल्यानंतरही बेल न उडाल्यामुळे मिळालेलं जीवदान विरळाच. (Batsman Clean Bold But Not Out)

(हेही वाचा – India Tour of England : इंग्लंडमध्ये पोहोचल्यावर भारतीय खेळाडूंचा पहिला सराव, काय काय घडलं?)

गोलंदाज पवन नेगी या चेंडूकडे नंतर बघत बसलेला दिसतो. त्याच्या चेहऱ्यावर अर्थातच निराशा आहे. हे जीवनदान मिळूनही युपी ब्रिजस्टार्स संघ हा सामना जिंकू शकला नाही. चिराग गांधीने ५८ चेंडूंत नाबाद १०१ धावा करूनही युपी संघ निर्धारित २० षटकांत ५ बाद १६८ धावांच करू शकला. एमपी टायगर्स संघाचं नेतृत्व युसुफ पठाणने केलं आणि संकेत शर्माच्या १११ धावांच्या जोरावर एमपी टायगर्स संघाने या सामन्यात २३९ धावांचं आव्हान उभं केलं होतं. पण, हा सामना गोलंदाजाला न मिळालेल्या बळीमुळेच जास्त गाजला. तो झाल्यानंतर ६ महिन्यांनंतरही तो व्हायरल झाला आहे. (Batsman Clean Bold But Not Out)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.