विरोधी पक्षनेते राहुल गांधी(Rahul Gandhi) यांनी ‘मॅच फिक्सिंग महाराष्ट्र’ या शीर्षकाखाली एका प्रसिध्द वृत्तपत्रात लेख लिहिला होता. या लेखातून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील निकालावर राहुल गांधीं(Rahul Gandhi)नी पुन्हा एकदा आक्षेप घेतला. त्यांनी निवडणूक आयोगाला या लेखातून प्रश्न विचारले. त्यावर आता निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिले आहे.(Rahul Gandhi)
(हेही वाचा आगामी विधानसभा निवडणुकांच्या पराभवाची आतापासूनच तयारी; CM Devendra Fadnavis यांचा राहुल गांधींना खोचक टोला )
दरम्यान, निवडणूक आयोगाने राहुल गांधींच्या आक्षेपाची दखल घेत भाष्य केले आहे. काँग्रेस नेते व विरोधी पक्षनेते राहुल गांधी(Rahul Gandhi) यांच्या आवाहनाला उत्तर देताना म्हटले की, त्यांनी आतापर्यंत आयोगाला कुठलेही अधिकृत पत्र लिहिलेले नाही किंवा भेटीची विनंतीही केली नाही. जेणेकरून, ते जेव्हा भेटीला येतील तेव्हा निवडणूक आयोगाला उत्तर देतील, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रत्युत्तर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेस नेते राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर दिले. मुख्यमंत्री फडणवीसांनी ‘जनतेने ज्यांना नाकारले, ते जनादेशाला नाकारतात!’ या शीर्षकाखाली महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे संपूर्ण गणितच मांडले. २०१४ ते २०२४ या कालावधीत वाढलेल्या मतदारांच्या संख्येवरही भाष्य केले. यासोबतच, त्यांनी राहुल गांधींना खोचक टोलाही लगावला. बिहारसह आगामी विधानसभा निवडणुकांच्या पराभवाची कारणेही त्यांना आतापासून तयार करायची आहेत, असा सणसणीत टोला फडणवीसांनी लगावला.
राहुल गांधींनी नेमकं काय म्हटलं होतं?
शनिवारी एका प्रसिध्द वृत्तपत्रात लिहिलेल्या लेखात राहुल गांधी(Rahul Gandhi) यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत फेरफार झाल्याचा आक्षेप नोंदवला. २०१९ आणि २०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत २०२४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील एकूण मतदारांमध्ये लक्षणीय वाढ झाली असा आरोप करत त्यांनी महाराष्ट्र निवडणुकीत “मॅच फिक्सिंग” केल्याचाही दावाही राहुल गांधींनी केला होता.(Rahul Gandhi)