गडचिरोली (Gadchiroli Elephant ) जिल्ह्यातील कोर्ला वनपरिक्षेत्रामध्ये वावरत असलेला हत्तींचा कळप सध्या मुक्कामी आहे. दोन टस्कर हत्ती नव्याने दाखल झाले आहेत. ग्रामस्थांनी कोणत्याही कारणाने हत्तीजवळ जाऊ नये किंवा त्यांना छेडू नये. असे केल्यास शांत असलेला हत्तींचा कळप बिथरला तर न भरून निघणारे नुकसान होईल, असा इशारा भारतीय वन्यजीव संस्थान कडून देण्यात आला आहे. एका मराठी वृत्तवाहिनीसोबत बोलताना डेहराडूनच्या संशोधक मैत्रेयी भावे यांनी ही माहिती दिली आहे. (Gadchiroli Elephant )
हेही वाचा-छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये ७ Naxalites ठार, २०२५ मध्ये बस्तरमध्ये १८० हून जणांचा खात्मा
गडचिरोली (Gadchiroli Elephant ) जिल्ह्यातील वडसा वनपरिक्षेत्रात छत्तीसगडवरून नवीन टस्कर हत्ती दाखल झाले आहेत. हे हत्ती एकदम तरुण आहेत. विणीचा काळ जवळ आला की ते ताकद दाखवतात. त्यांना छेडल्यास ते बिथरतील. परिणामी नवीन संघर्ष वाढेल. त्यामुळे हत्तींच्या मार्गात येऊ नका, अडथळे आणू नका, असे आवाहन गावकऱ्यांना करण्यात येत आहे. (Gadchiroli Elephant )
हेही वाचा- Konkan Railway : मुंबई – मडगाव मार्गावर १४ जूनला एकतर्फी विशेष रेल्वे धावणार
छत्तीसगडमध्ये जंगले विरळ झाली आहेत. तेथील लोकांनी हत्तींना हाकलणे सुरू केले. त्यांच्या सीमा बंद केल्या. त्यामुळे ते मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात इंद्रावतीच्या बाजूने आले. इथे त्यांना भरपूर खाद्य आहे. २०२२ मध्ये आलेले हत्ती तेलंगणापर्यंत जाऊन छत्तीसगडपर्यंत परत गेले होते. या कळपाला जाण्यासाठी मोठे जंगल नाही. ते उमरेड-कऱ्हांडला येथे येण्याची वा महाराष्ट्र वा मध्य प्रदेश पेंचच्या जंगलात जाऊन कान्हा व तिकडून छत्तीसगड जाऊ शकतात. (Gadchiroli Elephant )
हेही वाचा- RVNL Share Price : रेल्वे विकास निगम शेअरमध्ये सध्या वाढ का होतेय?
महाराष्ट्रामध्ये हत्ती स्थलांतरित होण्याचे मुख्य कारण म्हणजे त्यांच्या नैसर्गिक अधिवासावर होणारे बदल आणि नवीन अधिवास शोधणे. या बदलांमध्ये खाण प्रकल्प, मानवी हस्तक्षेप आणि वनभूमी उपलब्ध नसणे यांचा समावेश होतो. नैसर्गिक अधिवासाला धोका निर्माण झाल्याने हत्ती त्यांच्या नैसर्गिक अधिवासाला पर्याय म्हणून महाराष्ट्राच्या जंगलाकडे आकर्षित होत आहेत. कारण, इथे त्यांना अन्न आणि पाण्याची उपलब्धता अधिक आहे. (Gadchiroli Elephant )
हेही पहा-
Join Our WhatsApp Community