अमेरिकेत थरूर पिता-पुत्र आमने-सामने; पाकविषयी काय म्हणाले Shashi Tharoor ?

123

ऑपरेशन सिंदूरबाबत (Operation Sindoor) सर्व देशांमध्ये भारताची बाजू मांडणारे शशी थरूर (Shashi Tharoor) यांना अमेरिकेत स्वतःच्याच मुलाच्या तीव्र प्रश्नांना सामोरे जावे लागले. गुरुवारी, थरूर न्यूयॉर्कमध्ये माध्यमांशी बोलत असताना, त्यांचा पत्रकार मुलगा ईशान थरूर (Ishaan Tharoor) त्यांना प्रश्न विचारण्यासाठी उभा राहिला. त्यांच्या मुलाला उभे असलेले पाहून थरूर म्हणाले की, हा माझा मुलगा आहे, असे होता कामा नये. शशी थरूर यांनी हे बोलताच, तिथे उपस्थित असलेले सर्व जण हसायला लागले.

(हेही वाचा – Railway Accident : प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर; धावत्या ट्रेनमधून पडून एकाने गमावला हात)

न्यूयॉर्कमधील कौन्सिल ऑन फॉरेन रिलेशन्सच्या (Council on Foreign Relations) कार्यक्रमात माध्यमांशी बोलताना शशी थरूर यांनी आपल्या मुलाकडे पाहून हसले. हा माझा मुलगा आहे. थरूर यांनी असे म्हटल्यानंतर वॉशिंग्टन पोस्टच्या (The Washington Post) वतीने तेथे उपस्थित असलेल्या ईशान यांनी थरूर यांच्यासमोर आपला प्रश्न मांडला. ‘पहलगाम हल्ल्यातील (Pahalgam Terror Attack) पाकिस्तानच्या भूमिकेबाबत कोणत्याही देशाने सर्वपक्षीय शिष्टमंडळाकडे कोणत्याही प्रकारचे पुरावे मागितले होते का?.. पाकिस्तानने या हल्ल्यात आपला हात असल्याचा स्पष्ट इन्कार केला आहे’, असे प्रश्न ईशान थरूर यांनी विचारले. ईशान प्रश्न विचारत असताना थरूर यांनी आपल्या मुलाला माइक उचलण्यास सांगितले जेणेकरून त्यांना नीट ऐकू येईल. यासोबतच त्यांनी उर्वरित लोकांना संबोधित करत म्हटले… मी त्याला प्रश्न विचारला नाही. ईशानच्या प्रश्नाला उत्तर देताना थरूर म्हणाले की, तुम्ही हा मुद्दा उपस्थित केला याचा मला खूप आनंद आहे. मी थेट सांगू इच्छितो की, कोणत्याही देशाने आमच्याकडे कोणत्याही प्रकारचे पुरावे मागितलेले नाहीत. कुणालाच शंका नव्हती… होय, प्रसारमाध्यमांनी दोन-तीन ठिकाणी विचारलं आहे… आणि मी अगदी स्पष्टपणे सांगू इच्छितो की, भारताने ठोस पुराव्याशिवाय कोणतीही कारवाई केली नाही. “

मी तीन मुख्य गोष्टींकडे सर्वांचे लक्ष वेधू इच्छितो. पहिली गोष्ट म्हणजे पाकिस्तान गेल्या ३७ वर्षांपासून भारतावर दहशतवादी हल्ले करत आहे आणि पाकिस्तान प्रत्येक हल्ल्यात आपली भूमिका नाकारतो. म्हणजे ओसामा बिन लादेन कुठे सापडला, हे अमेरिकेने विसरता कामा नये. तो पाकिस्तानी सैन्याच्या शेजारी बसला होता आणि ओसामा कुठे आहे, हे आपल्याला माहित नाही हे पाकिस्तान सातत्याने नाकारत होता. याशिवाय २६/११ चा मुंबई हल्ला… पाकिस्तानने सातत्याने आपली भूमिका नाकारली आहे. पण सत्य जगाला माहित आहे… म्हणूनच मी म्हणतो की ते जगात दहशतवाद पाठवतात आणि नंतर ते नाकारत राहतात… जोपर्यंत त्याला रंगेहाथ पकडले जात नाही.

शशी थरूर हे अमेरिकेला जाणाऱ्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाला मोठे यश मिळाले आहे. थरूर यांच्या भेटीनंतर कोलंबियाने पहलगाम हल्ल्याबाबत आपले वक्तव्य बदलले, तर इतर देशांनीही भारताला पाठिंबा देण्याचा पुनरुच्चार केला.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.