Bangalore Stampede : बाहेर चेंगराचेंगरी होऊनही आरसीबीने विजयोत्सव सुरू ठेवल्यामुळे टीका

Bangalore Stampede : माजी खेळाडूंनी फ्रँचाईजीच्या या कृतीवर आश्चर्य व्यक्त केलं आहे. 

94
Bangalore Stampede : बाहेर चेंगराचेंगरी होऊनही आरसीबीने विजयोत्सव सुरू ठेवल्यामुळे टीका
  • ऋजुता लुकतुके

आयपीएल विजेतेपदानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने चिन्नास्वामी मैदानावर विजयोत्सव आयोजित केला होता. पण, चेंगराचेंगरीमुळे या सोहळ्याला गालबोट लागलं आणि चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यूही झाला. विशेष म्हणजे बाहेर अशी आपत्तकालीन परिस्थिती ओढवलेली असताना आता फ्रँचाईजीने कार्यक्रम ठरल्याप्रमाणे पूर्ण केला. फक्त सोहळा आटोपता घेतल्याचं त्यांच्याकडून कळवण्यात आलं. पण, तो रद्द करण्याचं सौजन्य त्यांना दाखवता आलं नाही. (Bangalore Stampede)

चाहत्यांनी सोशल मीडियावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू फ्रँचाईजी आणि स्टार खेळाडू विराट कोहलीला लक्ष्य केलं आहे. मृत्यूंची बातमी पसरल्यानंतर सोहळा सुरूच ठेवल्याबद्दल दोघांवर टीका होत आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू अतुल वासनने याविषयी एएनआय वृत्तवाहिनीशी बोलताना विराट कोहलीची बाजू घेतली आहे. ‘त्याला सोहळा सुरू होताना याविषयी माहिती नसणार,’ असं वासन या व्हिडिओत म्हणतो. (Bangalore Stampede)

(हेही वाचा – BMC : विद्युत कामे करणारी कंपनी पकडणार भटक्या जनावरांना; कुठे चालली आहे मुंबई महापालिका?)

‘राजकारणी लोक हे निर्दयी असतात आणि बंगळुरू फ्रँचाईजीचे मालक म्हणजे कॉर्पोरेट जगताचे प्रतिनिधी हे गेंड्याच्या कातडीचे असतात. त्यामुळे त्यांनी मैदानाबाहेर काय चाललंय हे समजल्यानंतरही कार्यक्रम पुढे चालू ठेवला असणार. पण, विराट किंवा इतर खेळाडूंपर्यंत त्यांनी ही बातमी पोहोचवलीच नसणार असं मला खात्रीने वाटतं. खेळाडूंना सगळं कळेपर्यंत कार्यक्रम निदान सुरू व्हायची वेळ आलेली असणार. विराटला सगळं माहीत होतं आणि तरी तो कार्यक्रमात सहभागी झाला यावर माझा विश्वासच नाही,’ असं अतुल वासन यांनी म्हटलं आहे. विराटने कार्यक्रम संपल्यानंतर लगेचच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहून झाल्या प्रकाराबद्दल दु:ख व्यक्त केलं. बंगळुरू फ्रँचाईजीचा माजी खेळाडू आणि कर्णधार एबी डिव्हिलिअर्सनेही झाल्याप्रकाराबद्दल खेद व्यक्त केला आहे. (Bangalore Stampede)

(हेही वाचा – IPL 2025, RCB Champions : विराटच्या आईने असा केला बंगळुरू विजयाचा आनंद साजरा)

 

View this post on Instagram

 

A post shared by Virat Kohli (@virat.kohli)

कर्नाटक सरकारने काही वेळानंतर चेंगराचेंगरीत ११ मृत आणि ३३ जण जखमी झाल्याचं जाहीर केलं. जखमींवर राज्यसरकारच्या वतीने मोफत उपचार होणार आहेत. शिवाय चेंगराचेंगरीची न्यायालयीन चौकशी करण्यात येणार आहे. (Bangalore Stampede)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.