1 of 6

२००४ चे स्वप्न (Chenab Bridge) २०२५ मध्ये पूर्ण होत आहे. हे केवळ देशाचे लष्करी सामर्थ्य वाढवणार नाही तर पर्यटनापासून व्यापारापर्यंत सर्व काही नवीन उंचीवर घेऊन जाणार आहे. हे देशाच्या अभियांत्रिकीचे एक अद्वितीय उदाहरण आहे. हा चिनाब रेल्वे पूल (Chenab Bridge) आहे. १६ वर्षात १४८६ कोटी रुपये खर्चून बांधलेला हा पूल केवळ अभियांत्रिकीचा एक उत्तम नमुना नाही तर तो भारतीय रेल्वेसाठी आजपर्यंतचा सर्वात आव्हानात्मक प्रकल्प देखील आहे. (Chenab Bridge)

चिनाब पुलासाठी (Chenab Bridge) २००८ मध्ये करार करण्यात आला होता. हा चिनाब पूल जम्मूतील बक्कल आणि कौरीतून सुरू होतो आणि कटरा ते बनिहालला जोडतो. हा उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक (यूएसबीआरएल) चा एक भाग आहे. यामागचा उद्देश असा आहे की हवामान बदल आणि इतर नैसर्गिक बदलादरम्यान जम्मू आणि काश्मीरमध्ये कनेक्टिव्हिटी वाढवणं आहे. (Chenab Bridge)

चिनाब (Chenab Bridge) हा पूल नदीपात्रापासून १,१७८ फूट उंचीवर आहे. तसेच आयफेल टॉवरपेक्षा पूल ३५ मीटर उंच असून या पुलाचं आयुष्य १२० वर्षे इतकं असल्याचं सांगितलं जातं. जगातील सर्वात उंच चिनाब पुलाच्या उद्घाटनापूर्वी स्थिरता आणि सुरक्षितता तपासण्यासाठी अनेक चाचण्या देखील करण्यात आलेल्या होत्या. (Chenab Bridge)

२६० किमी प्रतितास वेगाच्या वार्यांना आणि अति जास्त तापमान व भूकंपासह आदी समस्यांना तोंड देण्यास हा पूल सक्षम असेल. (Chenab Bridge)

चिनाब, कौरी आणि बक्कलच्या दोन्ही बाजूंनी बसवलेली पुलाची कमान महाकाय केबल क्रेनच्या मदतीने तयार करण्यात आलेली आहे. जी तयार करण्यास अभियंत्यांना तीन वर्षांचा कालावधी लागला. (Chenab Bridge)

या प्रदेशात वाहतूक सुविधेचा प्रश्न आहे. हा प्रश्न या पुलामुळे या प्रदेशात पुढे तयार होणार्या प्रकल्पांसाठी प्रवास आणि मालाची वाहतूक सुलभ होईल असं मानलं जातं. तसेच भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाचा प्रदेश असल्यामुळे या प्रदेशात तैनात असलेल्या सशस्त्र दलांसाठी रेल्वे मार्ग अधिक उपयुक्त ठरेल आणि पर्यटनाला चालना देण्यासही याची मदत होईल. (Chenab Bridge)