
मुसळधार पाऊसामुळे आसाम, अरुणाचल प्रदेश राज्यांमधील पूरस्थिती (Northeast floods) गुरुवारीही कायम होती. आसाममधील २१ जिल्ह्यांमधील सुमारे सात लाख लोक प्रभावित झाले आणि प्रमुख नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तर तर संततधार पावसामुळे अरुणाचल प्रदेशमधील २४ जिल्ह्यांत ३३ हजारहून अधिक लोक प्रभावित झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. (Northeast floods)
विविध भागात रेल्वे सेवा प्रभावित
बुधवारपर्यंत राज्यातील १६ जिल्ह्यांमध्ये ६.८ लाख लोक पुरामुळे प्रभावित झाले होते. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अहवालानुसार, या वर्षी राज्यात पूर आणि भूस्खलनात मृत्युमुखी पडलेल्या लोकांची संख्या २१ वर पोहोचली आहे. श्रीभूमी हा सर्वात जास्त प्रभावित जिल्हा आहे, जिथे २.१५ लाखांहून अधिक लोक प्रभावित झाले आहेत. विविध भागात रेल्वे सेवा प्रभावित झाल्या आहेत. कमी अंतराच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, परंतु लांब पल्ल्याच्या गाड्या धावत आहेत. (Northeast floods)
काझीरंगा राष्ट्रीय उद्यान देखील पाण्याखाली
काझीरंगा राष्ट्रीय उद्यान देखील पाण्याखाली आहे. मणिपूरमधील पूरपरिस्थितीत थोडी सुधारणा झाली आहे. नद्यांमध्ये पाणी कमी होऊ लागले आहे. आसाम रायफल्स आणि लष्कराने संपूर्ण राज्यात ऑपरेशन जलराहट अंतर्गत बचाव आणि मदत कार्य सुरू ठेवले आहे. राज्यात १.६५ लाखांहून अधिक लोक पुरामुळे प्रभावित झाले आहेत. (Northeast floods)
पुरामुळे ४३२ जनावरांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. भूस्खलन आणि पूर संबंधित घटनांमुळे पूर्व कामेंगमध्ये सात, लोअर सुबानसिरीमध्ये दोन आणि लोंगडिंग, लोहित आणि अंजाव जिल्ह्यात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. (Northeast floods)
सिक्कीममधून ६३ जणांची सुटका
उत्तर सिक्कीममधील चाटेन (जि. मंगन) येथे भूस्खलनात अडकलेल्या एकूण ६३ नागरिकांना बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले आहे. यामध्ये बहुतांश पर्यटकांचा समावेश आहे. लष्कर आणि स्थानिक प्रशासनाकडून चाटेन येथे बचावकार्य सुरू असून, अद्याप ६४ पर्यटक अडकल्याचे प्रशासनाने सांगितले. खराब हवामान आणि आव्हानात्मक भूप्रदेशामुळे बचावकार्यात अडथळा येत असल्याने हे काम थांबवण्यात आले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. (Northeast floods)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community