bakrid-eid-al-adha : बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर सर्वजीव मंगल प्रतिष्ठानची केंद्र सरकारकडे मागणी, अध्यक्ष डॉ. गंगवाल म्हणाले…

bakrid-eid-al-adha : धर्माच्या नावाखाली होणारी पशुहत्या रोखण्यासाठी केंद्र सरकारने कठोर कायदा करावा, अशी मागणी सर्वजीव मंगल प्रतिष्ठानचे संस्थापक व अध्यक्ष डॉ. कल्याण गंगवाल यांनी केली आहे. बकरी ईद(bakrid-eid-al-adha)च्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

220

bakrid-eid-al-adha : धर्माच्या नावाखाली होणारी पशुहत्या रोखण्यासाठी केंद्र सरकारने कठोर कायदा करावा, अशी मागणी सर्वजीव मंगल प्रतिष्ठानचे संस्थापक व अध्यक्ष डॉ. कल्याण गंगवाल यांनी केली आहे. बकरी ईद(bakrid-eid-al-adha)च्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सर्व धर्मात प्राणी व पशुहत्या निषेधार्ह मानली असून कोणत्याही धर्माने हत्येचे वा हिंसेचे समर्थन केलेले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यामध्ये गांभीर्याने लक्ष घालून कठोर कायदा आणून त्याची कडक अंमलबजावणी करावी, असे डॉ. गंगवाल म्हणाले.(bakrid-eid-al-adha)

बकरी ईद(bakrid-eid-al-adha)च्या पार्श्वभूमीवर बोलताना ते म्हणाले, उघड्यावर दिला जाणारा बकऱ्याचा बळी, त्यामुळे होणारे प्रदूषण, त्यातून पसरणारी रोगराई कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धोकादायक आहे. बकरी ईद अहिंसक व पर्यावरणपूरक व्हावी. अल्लाहने माणसाची सर्वात प्रिय गोष्ट भेट देण्याचा आदेश दिला होता. अंहकार हा माणसाला प्रिय असून, त्या अहंकाराचा त्याग करावा, त्याचा बळी दिला जावा, अशी अल्लाहची अपेक्षा होती. कुराणनुसारही मांस, रक्त व हत्येचा निषेध केला आहे. त्यामुळे बकरी ईदच्या नावाखाली प्राण्यांचा बळी देऊ नये, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

(हेही वाचा Bengaluru Stampede : काँग्रेस सरकारचा असंवेदनशीलपणा पहा, पोलिसांनी सांगूनही विजयी रॅलीचे आयोजन; क्रीडा पत्रकाराने व्हिडिओत काय म्हटले? )

तसेच, मुस्लिम बांधवांना आवाहन करताना ते म्हणाले, त्यांनी प्रतीकात्मक बकरी ईद(bakrid-eid-al-adha) साजरी करावी. त्यासाठी पिठाची प्रतीकात्मक बकरी, किंवा बकरीच्या प्रतिमेचा उपयोग करून ही ईद(bakrid-eid-al-adha) साजरी करावी, असे सांगतानाच मुस्लिम बांधवानी यंदाच्या बकरी ईद(bakrid-eid-al-adha)ला पशुबळी देण्यापासून दूर राहावे. कोणत्याही प्राण्याचा जीव घेण्याचा कुणालाही अधिकार नाही, असेही त्यांनी सांगितले. त्याचबरोबर, उघड्यावर बळी देणे कायद्याने गुन्हा असून त्या कायद्याचे पालन केले जावे. मोरोक्कोसारख्या मुस्लिमबहुल देशातही पर्यावरणाचा विध्वंस थांबविण्याकरिता बकरी कापण्यावर कायद्याने बंदी आहे, असे डॉ. गंगवाल म्हणाले.

(हेही वाचा मुस्लिम देश Morocco मध्ये बकरा कापण्यास परवानगी नाही! )

ते पुढे म्हणाले, मोरोक्कोसारखा मुस्लिम देश असा निर्णय घेऊ शकतो तर आपण का घेत नाही, असा सवाल उपस्थित करतानाच प्राण्यांचा बळी दिल्यानंतर त्यातून रक्त, मांस यामुळे रोगराई पसरते. पाणी व हवेचे प्रदूषण होते. घातक वायू तयार होतो. कोरोनाचा शिरकाव पुन्हा होत आहे. त्यामुळे प्राणी कापण्यावर बंदी घातली पाहिजे, अशी मागणीही डॉ. गंगवाल यांनी पत्रकार परिषदेत केली. संपूर्ण जगामध्ये गेल्या वर्षी आकडेवारीप्रमाणे १८ कोटी प्राण्यांचे बळी दिले गेले असून, त्यात भारतातील पशुहत्येची संख्या २ कोटी आहे. हे सगळे पर्यावरणाला अत्यंत घातक आहे, असेही डॉ. गंगवाल यावेळी नमूद केले.(bakrid-eid-al-adha)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.