पहिल्यांदाच आयपीएल (IPL) जिंकणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bangalore, आरसीबी) संघाच्या जल्लोषाला बुधवारी गालबोट लागले. विजेत्या खेळाडूंचे स्वागत करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर (Chinnaswamy Stadium) जमलेल्या गर्दीत चेंगराचेंगरी होऊन ११ जणांचा मृत्यू झाला. ३३ जण जखमी झाले आहेत. (Bengaluru Stampede)
घटनेनंतर संध्याकाळी पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या (CM Siddaramaiah) म्हणाले, “मी या घटनेचा बचाव करत नाहीये, पण देशात यापूर्वी अनेक मोठे अपघात घडले आहेत, जसे की कुंभमेळ्यात ५०-६० जणांना आपला जीव गमवावा लागला. तथापि, याचा अर्थ असा नाही की आपण जबाबदारी टाळली पाहिजे.”
(हेही वाचा – Nashik Accident : चालकाचा ताबा सुटला आणि भरधाव कार थेट बंगल्यात शिरली ; 5 जणांचा मृत्यू, 2 गंभीर जखमी)
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारे समर्थन करणे हा निर्लज्जपणाचा कळस आहे, अशी चर्चा सामाजिक माध्यमांत सुरु आहे. उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार (D.K. Shivakumar) यांनीही हा लोकांचा दोष आहे, असे म्हणून घडलेल्या प्रकाराची जबाबदारी झटकली आहे. त्याचवेळी भाजपने त्यांचा राजीनामा मागितला आहे. उत्तरप्रदेशमध्ये झालेल्या दुर्दैवी चेंगराचेंगरीच्या वेळी योगी सरकारवर सगळ्याचे खापर फोडण्यात आले होते. कर्नाटक सरकार मात्र स्वतःवर कोणतीच जबाबदारी न घेता क्रिकेटप्रेमींवर खापर फोडत आहे, याने सामाजिक माध्यमांवर संतप्त प्रतिक्रिया पहायला मिळत आहेत.
सामाजिक कार्यकर्त्या स्नेहमयी कृष्णा यांनी याबाबत क्यूबन पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार आणि क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्यांवर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. त्यांनी आयपीसीच्या कलम १०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणीही केली आहे.
प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, गर्दीत पडलेली व्यक्ती उठू शकली नाही. गर्दीमुळे रुग्णवाहिकाही उशिरा पोहोचली. लोक रस्त्यावरच जखमींना सीपीआर देत राहिले. एबीएम मेडिकल कॉलेजच्या डॉक्टरांनी सांगितले की, मृतांमध्ये बहुतेक तरुण आहेत. यामध्ये ५ महिला आणि ६ पुरुष आहेत. सर्वांचे वय १३ ते ३३ वर्षांच्या दरम्यान आहे. डोक्यात, पाठीच्या कण्याला आणि पोटात गंभीर दुखापतींमुळे त्यांचा मृत्यू झाला. (Bengaluru Stampede)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community