-
प्रतिनिधी
राज्यात इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा शिकवण्यास सक्ती करणार नसल्याचे सरकारने जाहीर केले असले तरी, अद्याप याबाबत कोणताही लेखी आदेश निघाल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आक्रमक झाले आहेत. “सरकारने त्वरित स्पष्ट लेखी आदेश काढावा, अन्यथा मनसे आंदोलनाच्या मैदानात उतरेल आणि त्याची पूर्ण जबाबदारी सरकारवर असेल,” असा स्पष्ट इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे.
शिक्षणात गोंधळ आणि जनभावनेचा उद्रेक
राज्यात गेल्या दोन महिन्यांपासून इयत्ता पहिलीपासून हिंदी शिकवण्याच्या निर्णयावरून मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. सुरुवातीला राज्य सरकारने तीन भाषा शिकवण्याचा निर्णय घेतला होता, ज्यात हिंदी ही सक्तीची तिसरी भाषा असणार, अशी घोषणा झाली होती. या निर्णयाचा मनसेने तीव्र विरोध करताच जनमत उभे राहिले आणि सरकारला माघार घ्यावी लागली. सरकारने जाहीरपणे सांगितले की, इयत्ता पहिलीत मराठी आणि इंग्रजी या दोनच भाषा शिकवण्यात येतील. हिंदीची सक्ती होणार नाही. मात्र, या घोषणेला अद्याप लेखी आदेशाचे रूप मिळालेले नाही आणि उलट हिंदी पुस्तकांची छपाई सुरू झाली आहे, याकडे राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी लक्ष वेधले.
(हेही वाचा – Vishalgad Bakri Eid : विशाळगडावरील उरुसाला उच्च न्यायालयाची परवानगी; कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटना संतप्त)
“हिंदी राष्ट्रभाषा नाही, तिची सक्ती का?” – राज ठाकरे यांचा सवाल
राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सरकारला विचारले, “हिंदी ही देशातील अनेक भाषांपैकी एक आहे, ती राष्ट्रभाषा नाही. मग तिची सक्ती का केली जाते? अन्य राज्यांनी आपल्या भाषिक अस्मितेसाठी हिंदीची सक्ती नाकारली आहे, मग महाराष्ट्र सरकार का गोंधळले आहे?” ते पुढे म्हणाले, “सरकार कोणाच्या दबावाखाली आहे? तीन भाषा शिकवण्यामागचा शैक्षणिक विचार काय आहे? जर तुम्ही घोषणा केलीत की पहिलीतून दोनच भाषा शिकवल्या जातील, तर ती अमलात का आणत नाही? लेखी आदेश का नाही?”
“सरकारला जाग येत नसेल तर आम्ही जागं करू” – आंदोलनाची तयारी
राज ठाकरे यांनी शिक्षण मंत्री दादा भुसे यांना पत्र लिहून या निर्णयावर तातडीने लेखी आदेश काढण्याची मागणी केली आहे. अन्यथा, “मनसे रस्त्यावर उतरेल, आणि जो संघर्ष उभा राहील, त्याची जबाबदारी केवळ राज्य सरकारची असेल,” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सरकारला खडसावले की, “आपण मराठी आहात, मग इतर राज्यांच्या शासनकर्त्यांप्रमाणे भाषिक अस्मिता कधी दाखवणार? महाराष्ट्राची अस्मिता जागी ठेवण्यासाठी आता निर्णयात ठाम राहा,” असे आवाहन त्यांनी केले.
(हेही वाचा – Water Conservation Department : सुधारित बृहत आराखडा तयार करत दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन; मंत्री Sanjay Rathod यांची घोषणा)
हिंदी पुस्तकांची छपाई सुरू – सरकारचे भूमिकेवरून विचलन?
राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या म्हणण्यानुसार, “हिंदी पुस्तकांची छपाई सुरू झाल्याचा अर्थ सरकार आपला निर्णय मागे घेणार का?” हा संशय आता बळावत आहे. त्यामुळेच मनसेने आंदोलनाची चेतावणी दिली आहे. राज ठाकरे यांचा स्पष्ट इशारा आणि सरकारच्या घोषणा-कारवाईमधील विसंगतीमुळे राज्यातील शिक्षण धोरणावर पुन्हा एकदा वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे. आता सरकार काय निर्णय घेते, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community