Bangalore Stampede: आरसीबीच्या विजयी मिरवणुकीत चेंगराचेंगरी; ११ जणांचा मृत्यू, २५ हून अधिक जखमी

116
Bangalore Stampede : बाहेर चेंगराचेंगरी होऊनही आरसीबीने विजयोत्सव सुरू ठेवल्यामुळे टीका
Bangalore Stampede : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) मंगळवारी ०३ जून या दिवशी झालेल्या आयपीएलच्या थरारक अंतिम सामन्यात पंजाब किंग्जचा ६ धावांनी पराभव करून इतिहास रचला. दरम्यान, आरसीबी संघाच्या विजयी मिरवणुकीला बुधवारी चेंगराचेंरीचे गालबोट लागले. दरम्यान बुधवार ४ जून या दिवशी बंगळुरुमधील चिन्नास्वामी स्टेडियममध्ये (Chinnaswamy Stadium, Bangalore) होणाऱ्या आरसीबीच्या विजयी मिरवणुकीच्याआधी गोंधळ होऊन चेंगराचेंगरी झाली. चिन्नास्वामी स्टेडियम बाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाला असून २५ हून अधिक जखमी झाले आहेत. (Bangalore Stampede)
(हेही वाचा – Vaishnavi Hagawane Case : निलेश चव्हाणला शस्त्र परवाना गृहविभागाच्या परवानगीने मिळाला?; तपासातून माहिती समोर)

चेंगराचेंगरी नेमकी कशी झाली?
मिळालेल्या माहितीनुसार, पंजाबवर मोठा विजय मिळवल्यानंतर कर्नाटक क्रिकेट असोशिएशनतर्फे बंगळुरू संघाच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या समारंभाला कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या (Karnataka CM Siddaramaiah) तसेच उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार हे बडे नेते उपस्थित राहणार होते. तर दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे सर्वच खेळाडू यात सहभागी होणार होते. यामध्ये भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली हा देखील येणार होता. या सर्वांचाच या कार्यक्रमात सत्कार होणार होता. ही बाब समजल्यानंतर स्टेडियमच्या बाहेर बंगळुरू संघाच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. ही गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी काही ठिकाणी सौम्य लाठीचार्ज केला. त्यानंतर गर्दी अनियंत्रित झाली आणि यात एकूण ११ चाहत्यांचा मृत्यू झाला आहे. अद्याप ही या मृतांची ओळख पटलेली नाही. तर २० ते २५ जण यात जखमी झाले असून त्यांची प्रकती चिंताजनक आहे. त्यामुळे आता मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.