North Sikkim landslide : हवाई दलाची चोख कामगिरी; भूस्खलनग्रस्त चाटेनमधून २ अमेरिकन नागरिकांसह ३३ जणांची सुखरूप सुटका

North Sikkim landslide :    सिक्कीम राज्याच्या उत्तर भागात(North Sikkim landslide) मुसळधार पावसाने भूस्खलनाची घटना घडली आहे. या भूस्खलनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवाई दलाने चाटेनच्या दुर्गम भागात तातडीने बचाव आणि मदत कार्य हाती घेतले. मुसळधार पावसाने प्रभावित झालेल्या चाटेन प्रदेशातून दोन अमेरिकन नागरिकांसह ३३ अडकलेल्या लोकांना बाहेर काढले आहे.(North Sikkim landslide)

53

North Sikkim landslide :    सिक्कीम राज्याच्या उत्तर भागात(North Sikkim landslide) मुसळधार पावसाने भूस्खलनाची घटना घडली आहे. या भूस्खलनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवाई दलाने चाटेनच्या दुर्गम भागात तातडीने बचाव आणि मदत कार्य हाती घेतले. मुसळधार पावसाने प्रभावित झालेल्या चाटेन प्रदेशातून दोन अमेरिकन नागरिकांसह ३३ अडकलेल्या लोकांना बाहेर काढले आहे.(North Sikkim landslide)

सिक्कीममधील विनाशकारी भूस्खलननंतर भारतीय हवाई दलाच्या Mi-१७ हेलिकॉप्टरने जलद गतीने मदत आणि आपत्ती निवारण मोहिमा सुरू केल्या. या मोहिमेत मदत साहित्य पुरविणे, एनडीआरएफ पथके दाखल करणे आणि दुर्गम चाटेन प्रदेशातून दोन अमेरिकन नागरिकांसह ३३ अडकलेल्यांना बाहेर काढणे, याचा समावेश आहे.

(हेही वाचा Vaishnavi Hagawane Case : निलेश चव्हाणला शस्त्र परवाना गृहविभागाच्या परवानगीने मिळाला?; तपासातून माहिती समोर )

लाचेनमधून पहाटेच्या वेळी अडकलेल्या ११३ पर्यटकांना बाहेर काढण्यासाठी केलेली याआधीची मोहीम हवाई दलाला खराब हवामानामुळे रद्द करावी लागली होती. त्यानंतर आता एनडीआरएफ ०९ कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारे एक एमआय-१७ हेलिकॉप्टर सकाळी ६ वाजता पाकयोंग विमानतळावरून उड्डाण केले. परंतु, मंगन आणि चाटेनजवळ दृश्यमानता कमी असल्याने मोहीम अर्धवट सोडून माघारी परतावे लागले.

तर दुसरीकडे, मणिपूरमध्ये मुसळधार पावसामुळे गेल्या ४८ तासांत पूर आणि भूस्खलनामुळे ३,८०२ लोक प्रभावित झाले आहेत. ८८३ घरांचे नुकसान झाले असून उत्तर सिक्कीम(North Sikkim landslide)मध्ये सुमारे १५०० पर्यटक अडकले आहेत. रस्त्यावर डोंगरांचे ढिगारे साचले असल्याने रस्ता बंद करण्यात आला आहे. प्रशासन आणि बचाव पथके ढिगारा काढण्यात गुंतली आहेत.

पंतप्रधान मोदी व केंद्रीय गृहमंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांशी संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी आसामचे मुख्यमंत्री हिमांता बिस्वा सरमा आणि सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेम सिंह तमांग यांच्याशी स्वतंत्रपणे चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच त्यांनी मणिपूरचे राज्यपाल अजय भल्ला यांच्याकडूनही तेथील परिस्थितीची माहिती घेतली.

ईशान्येकडील राज्यांमध्ये मुसळधार पावसामुळे परिस्थिती गंभीर होत चालली आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी आसाम, अरुणाचल आणि सिक्कीमच्या मुख्यमंत्र्यांशी आणि मणिपूरच्या राज्यपालांशीही फोनवरून चर्चा केली. केंद्राकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन राज्यांना दिले.(North Sikkim landslide)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.