-
ऋजुता लुकतुके
मंगळवारी मध्यरात्री रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने आयपीएल चषकावर पहिल्यांदा नाव कोरलं, तेव्हा सगळ्यांनीच हे विजेतेपद विराट कोहलीला बहाल केलं. अगदी कर्णधार रजत पाटिदारनेही हा चषक विराटला समर्पित अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या. कारण, इतर खेळाडू आणि सपोर्ट स्टाफपैकी कुणीच इतकी वर्षं या फ्रँचाईजीबरोबर एकनिष्ठ राहिलेलं नाही. विराट मागची १८ वर्षं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूबरोबर आहे. त्याच्याच शब्दांत सांगायचं तर, ‘त्याने या फ्रँचाईजीला आपलं तारुण्य, कौशल्य आणि अनुभव दिला आहे.’ (IPL 2025, RCB Champions)
(हेही वाचा – IPL 2025, RCB Champions : १८ वर्षांनंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला विजेतेपद, बंगळुरूत रस्त्या रस्त्यावर जल्लोष)
विजेतेपदानंतर विराटवर चारही बाजूंनी अभिनंदनचा वर्षाव झाला. आपला जुना मित्र एबी डिव्हिलिअर्स, ज्येष्ठ सहकारी ख्रिस गेल यांना विराटने कडकडून मिठी मारली. पण, रवी शास्त्रीला तो सामोरा गेला तेव्हा विराटने त्याच्याकडे झेप घेऊन त्याच्या अंगावर उडीच मारली. विराट अगदी लहान मुलासारखा झाला होता. विराटची पत्नी अनुष्का त्याच्याबरोबरच होती. आणि तिनेही टाळ्या वाजवून आणि भावपूर्ण नजरेनं या प्रसंगाला दाद दिली. कोहली भारतीय संघाचा कर्णधार असताना रवी शास्त्री बराच काळ संघाचा मुख्य प्रशिक्षक होता. या दोघांनी भारतीय क्रिकेटसाठी एकत्र खूप मोठं योगदान दिलं आहे. भारतीय क्रिकेटला विजेतेपदाच्या उंचीपर्यंत नेण्याचं काम या जोडीने केलं. (IPL 2025, RCB Champions)
(हेही वाचा – उद्धव-राज एकत्र आले तरी धक्का बसणार नाही, भाजपाचा BMC Elections ‘गेमप्लॅन’ तयार!)
२०२१ च्या टी-२० विश्वचषकापर्यंत रवी शास्त्री मुख्य प्रशिक्षक होता. या काळात भारतीय संघ एकदिवसीय आणि कसोटीतही क्रमवारीत अव्वल नेण्याचं काम या दोघांनी केलं. भारतीय संघाला इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकून दिल्या. दोनदा वर्षाच्या शेवटी कसोटीत अव्वल असलेल्या संघाला मिळणारी आयसीसीची गदा भारतीय संघाने पटकावली. त्यामुळे विराटच्या मनात शास्त्रीबद्दल वेगळं स्थान आहे. आपल्या निवृत्तीचा निर्णयही त्याने रवी शास्त्रीबरोबरच चर्चा करूनच घेतला होता. (IPL 2025, RCB Champions)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community