पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरनंतर सीमा सुरक्षा दलाने (BSF) अवैध बांगलादेशींना परत पाठवण्याचे काम तीव्र केले आहे. तसेच घुसखोरी रोखण्यासाठी बीएसएफने संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेक़डून (डीआरडीओ) तांत्रिक मदत मागितली आहे. (BSF)
बीएसएफकडून (BSF) भारत-बांगलादेश सीमेवर येणाऱ्या सुंदरबनच्या 113 किमी परिसरात ड्रोन, रडार आणि उपग्रहांसह अनेक पाळत ठेवणारी यंत्रणा तैनात करण्याची मागणी करण्यात आली आहे. गेल्या महिन्यात नॉर्थ ब्लॉकमध्ये गृह मंत्रालयात झालेल्या एका महत्त्वाच्या बैठकीत बीएसएफने (BSF) ही मागणी केली होती. बीएसएफने (BSF) भारत-बांगलादेश सीमेवर सुरक्षा वाढवली आहे.
हेही वाचा- FBI : चीन अमेरिकेत पसरवतोय कृषी दहशतवाद ! धोकादायक बुरशीसह दोन चिनी नागरिकांना अटक
सुंदरबन हा अतिशय संवेदनशील भाग मानला जातो आणि येथून मोठ्या संख्येने भारतात घुसखोरी होते, त्यामुळे बीएसएफ अधिक सतर्क आहे. दाट खारफुटीच्या जंगलांमुळे आणि कठीण भूप्रदेशामुळे येथे मोठ्या प्रमाणात घुसखोरी होते. सध्या बीएसएफ या परिसरातील सुमारे 123 किलोमीटर पसरलेल्या पट्ट्यावर लक्ष्य ठेवतो. (BSF)
गुप्तचर संस्थांच्या मते, काही दहशतवादी संघटना समुद्री मार्गाने आणि सुंदरबनचा मार्गाने भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करू शकतात. सध्या बीएसएफ 8 तरंगत्या सीमा चौक्या (बीओपी) आणि 96 गस्त घालणाऱ्या बोटींच्या मदतीने सीमेवर लक्ष ठेवते. त्यामुळे या भागात तांत्रिक देखरेख यंत्रणा तैनात करण्याचा प्रस्ताव डीआरडीओला दिला आहे. (BSF)
या भागाला त्यांना भेट देण्यास सांगण्यात आल्याचे गृह मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. त्याचप्रमाणे, पश्चिम बंगाल सरकारकडे निरीक्षण मनोरे उभारण्याची मागणी देखील करण्यात आली आहे. केंद्र सरकारने सुंदरबनमध्ये आधीच अतिरिक्त सैन्य तैनात केले आहे. सर्व सुरक्षा यंत्रणांमध्ये गुप्तचर समन्वय अधिक मजबूत करण्यावर भर दिला आहे. (BSF)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community