Sikkim Landslide : उत्तर सिक्कीममध्ये रविवारी रात्री उशिरा पुन्हा लाचेन नदीतील पाण्याची पातळी वाढली. यात चट्टेन येथे भूस्खलन झाले. एकूण १,६०० पर्यटक या भूस्खलनात (Landslide) अडकले. गुरुवार, २९ मे या दिसशी आठ पर्यटकांसह एकूण नऊ जण बेपत्ता झाले होते. यांचा मृत्यू झाल्याचा संशय आहे. लाचेनपासून सुमारे तीन किमी अंतरावर असलेले चट्टेन येथे अनेक लष्करी छावण्याही आहेत. लष्करी छावणीवर भूस्खलन झाले आणि नऊ जण बेपत्ता आणि लष्कराचे तीन जवान हुतात्मा झाले. (Sikkim Landslide)
(हेही वाचा – वॉटर टॅक्सी सुरू करण्यासाठी बंदर विभागाने नियोजन करावे; मंत्री Nitesh Rane यांच्या सूचना)
“लाचेन नदीतील (Lachen River) पाण्याची पातळी वाढल्यानंतर चट्टेन येथील लष्करी छावणीवर भूस्खलन झाले. लष्कराच्या तीन जवानांचे मृतदेह सापडले आहेत आणि नऊ जवान बेपत्ता आहेत. लष्कराकडून शोध मोहीम सुरू आहे,” असे मंगन जिल्ह्यातील चुंगथांगचे उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण थटल यांनी सांगितले. ३० मे पासून लाचुंगमध्ये अडकलेल्या १,६०० पर्यटकांना सोमवारी सकाळी वाचवण्यात आले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
“सोमवारी लाचुंगमधून ३८० मुलांसह सुमारे १,६०० पर्यटकांना वाचवण्यात आले. मुसळधार पावसामुळे अनेक भूस्खलन झाले आणि नद्याही दुथडी भरून वाहू लागल्या. रविवारी रात्री ढिगारा उचलण्यात आला. यानंतर, २ जून सोमवारी सकाळी बचाव कार्यही सुरू झाले. लाचेनमध्ये अजूनही सुमारे दीडशे पर्यटक अडकले आहेत. ते सुरक्षित आहेत आणि हॉटेलमध्ये आहेत. एनडीआरएफ (राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल) देखील तेथे आहे,” असे मंगनचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
(हेही वाचा – ICAI ने जाहीर केले सीए परीक्षेचे वेळापत्रक; अर्ज प्रक्रिया ‘या’ तारखेपासून होणार सुरु)
ईशान्य भारतात पुराचा कहर कायम; बळींची संख्या ३४ वर
ईशान्य हिंदुस्थानात मुसळधार पाऊस तसेच पुराचा कहर कायम आहे. सिक्कीम, आसाम, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मेघालय आणि त्रिपुरामध्ये पूर आणि भूस्खलनाच्या घटना घडत आहेत. त्यातील बळींची संख्या सोमवारी ३४ वर पोहोचली. आसाममध्ये मागील ४८ तासांत पुरात तीन जणांनी प्राण गमावले, तर गुवाहाटीच्या विविध भागांत झालेल्या भूस्खलनामध्ये ५ जणांचा मृत्यू झाला. आसाम आणि अरुणाचल प्रदेशच्या राज्य सरकारांच्या विनंतीवरून भारतीय हवाई दलाने हेलिकॉप्टरच्या साहाय्याने बचाव मोहीम सुरू ठेवली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community