Assam Floods : ईशान्य भारतात धुवाँधार पाऊस; पूरपरिस्थितीने जनजीवन कोलमडले, नागरिकांना सतर्क राहण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Assam Floods :  आसाममध्ये मुसळधार पावसाने पूरपरिस्थिती(Assam Floods) निर्माण झाली असून राज्यातील यंत्रणा सतर्क आहेत. मुसळधार पावसाने राज्यातील कुशियारा नदी तसेच, जिल्ह्यातील इतर नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. तर आसामच्या श्रीभूमी जिल्ह्यात पूरपरिस्थिती(Assam Floods) अजूनही गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.

61

Assam Floods :  आसाममध्ये मुसळधार पावसाने पूरपरिस्थिती(Assam Floods) निर्माण झाली असून राज्यातील यंत्रणा सतर्क आहेत. मुसळधार पावसाने राज्यातील कुशियारा नदी तसेच, जिल्ह्यातील इतर नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. तर आसामच्या श्रीभूमी जिल्ह्यात पूरपरिस्थिती(Assam Floods) अजूनही गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, भारत-बांगलादेश सीमेला लागून असलेल्या जिल्ह्यात सुमारे ४० हजार नागरिक प्रभावित झाले आहेत. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी देखील नदीच्या पातळीत वाढ होण्याचा इशारा दिला होता व नागरिकांना विशेषतः नदीकाठच्या वस्तींना सावधगिरी बाळगण्यास सांगितले होते.(Assam Floods)

(हेही वाचा Tripura Floods : त्रिपुरात सततच्या पावसामुळे हाहाकार, तब्बल १,३०० कुटुंबांचं स्थलांतरण, मुख्यमंत्री म्हणाले… )

मुसळधार पावसाने पुराच्या पहिल्याच टप्प्यात राज्यातल्या विविध जिल्ह्यातील ३०० हून अधिक महसूल गावे प्रभावित झाली आहेत. जिल्हा प्रशासनाने उभारलेल्या मदत छावण्यांमध्ये अनेक पूरग्रस्त(Assam Floods) नागरिकांनी आश्रय घेतला आहे. श्रीभूमी जिल्ह्याचे जिल्हा आयुक्त प्रदीप कुमार द्विवेदी यांनी एएनआयशी बोलताना सांगितले की, जिल्ह्यातील ३०० हून अधिक महसूल गावांना पुराचा मोठा फटका बसला आहे. येथे दोन दिवसांपासून मदतकार्य सुरू असून नागरिकांना अन्नपुरवठा करण्यात येत आहे. तसेच, वैद्यकीय शिबिरे आयोजित केली आहेत, असेही जिल्हा आयुक्तांनी सांगितले.(Assam Floods)

पुरा(Assam Floods)मुळे आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू

आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पूर अहवालानुसार, आसाममधील १९ जिल्ह्यांमधील ३.६४ लाखांहून अधिक नागरिक पुरामुळे प्रभावित झाले आहेत. राज्यातील ५४ महसूल मंडळांतर्गत ७५८ गावे पुराच्या पाण्याखाली गेल्याचे समोर आले आहे. तसेच, काही ठिकाणी किरकोळ दरड कोसळण्याच्या घटना घडल्या तर मुसळधार पावसामुळे कुशियारा, सिंगला, बराक आणि लोंगाई या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली होती. सद्यस्थितीस पाऊस कमी झाला असून दोन नद्यांची पाणी पातळी कमी होत आहे, असे श्रीभूमी जिल्ह्याचे जिल्हा आयुक्तांनी सांगितले.(Assam Floods)

मुख्यमंत्री सरमा यांनी ‘एक्स’वर पोस्टमध्ये काय म्हटले?

“अरुणाचल प्रदेशात मुसळधार पाऊस – किबिटू (१७ सेमी), हायुलियांग (१५ सेमी), कलाकतांग (१० सेमी) – यामुळे नदीच्या पातळीत मोठी वाढ होऊ शकते. आसाममध्ये सिलचर (४२ सेमी), करीमगंज (३५ सेमी), हैलाकांडी (३० सेमी) आणि जवळच्या भागात आधीच मुसळधार पाऊस पडत आहे. सखल आणि नदीकाठच्या भागातील लोकांना सतर्क राहण्याचा आणि स्थानिक सूचनांचे पालन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे,” असे मुख्यमंत्री सरमा यांनी ‘एक्स’ पोस्ट म्हटले.

(हेही वाचा Uttar Pradesh : गाझियाबादमध्ये ईदच्या दिवशी गोहत्या थांबवण्यासाठी आमदाराने उठविला आवाज, थेट डीसीपींना लिहिले पत्र )

ईशान्येकडील प्रदेश मुसळधार पावसा(Assam Floods)ने झोडपले असताना, आसाम, मणिपूर, त्रिपुरा, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश आणि इतर अनेक भागात पूर, भूस्खलन आणि नदीच्या पातळीत वाढ झाली आहे. आसामचे मंत्री जयंत मल्लबरुआ यांच्या मते, आसाममध्ये भूस्खलनामुळे किमान ५ जणांचा मृत्यू झाला असे सांगतानाच राज्य सरकारने बळींच्या नातेवाईकांना ४ लाखांची मदत जाहीर केल्याचे सांगितले.(Assam Floods)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.