Bangladeshi Infiltrators : तपास यंत्रणांच्या ‘ऑपरेशन पुश-बॅक’मुळे घाबरलेले बांगलादेशी घुसखोरां(Bangladeshi Infiltrators)नी स्वतःहून मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला आहे. अटकेच्या कारवाईच्या भीतीने बांगलादेशी घुसखोरां(Bangladeshi Infiltrators)नी स्वतःहून सीमेवर पोहोचत मायदेशात पाऊल टाकले आहे. याआधीच भारतीय सुरक्षा एजन्सींनी २ हजारांहून अधिक जणांची बांगलादेशात रवानगी केली आहे. तर काहींनी स्वतःहून म्हटले की, आम्हाला मायेदेशात परत जायचे आहे.(Bangladeshi Infiltrators)
(हेही वाचा Pakistan Fake Report : भारत-रशिया मैत्रीत फूट पाडण्याचा प्रयत्न फेल; पाकिस्तानचा खोटारडेपणा पुन्हा एकदा उघड )
दरम्यान, भारतात बेकायदेशीरपणे घुसलेल्या बांगलादेशींना पकडल्यावर सुरक्षा एजन्सींकडून अटक केली जात आहे. कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी आतापर्यंत २ हजार जण स्वतःहून सीमेवर पोहोचले असून मायदेशी परतले आहेत. विशेष म्हणजे भारतात अवैधरित्या राहणाऱ्या बांगलादेशींना हुसकावून लावण्यासाठी ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सुरू झालेल्या ऑपरेशन पुश-बॅकचा परिणाम समोर येत आहे. आतापर्यंत २ हजार बांगलादेशी घुसखोरां(Bangladeshi Infiltrators)ची मायदेशात रवानगी केली आहे.
तसेच, देशातील विविध ठिकाणी अवैधरित्या वास्तव्यास असलेले सुमारे घुसखोर(Bangladeshi Infiltrators) आता सीमेवर येत मायदेशी परतण्यास सज्ज आहेत. देशातील अनेक राज्यांनी अवैध बांगलादेशींची ओळख पटविण्याची प्रक्रिया वेगवान केली आहे. बांगलादेशी घुसखोरां(Bangladeshi Infiltrators)ना हाकलून लावण्यासाठी केंद्र सरकारने नवीन सर्च ऑपरेशन सुरू केले असून अनधिकृतपणे याला ऑपरेशन पुश-बॅक असे नाव देण्यात आले आहे.
कायदेशीर प्रक्रियेला घाबरले अवैध बांगलादेशी
माध्यमांच्या वृत्तानुसार, बांगलादेश बॉर्डर गार्ड्स(बीजीबी) देखील ऑपरेशन पुश-बॅकमध्ये भारतीय सुरक्षेला सकारात्मक प्रतिसाद देत आहेत. अवैधरित्या भारतात वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींना पकडून अटक केली जात आहे. कायदेशीर प्रक्रियेपासून वाचण्यासाठी, आतापर्यंत २ हजार बांगलादेशींनी स्वतःहून मायदेशी परतण्याची तयारी दर्शविली आहे.
दिल्लीत सर्वाधिक अवैध बांगलादेशीं(Bangladeshi Infiltrators)ना अटक
देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत ९०० हून अधिक अवैध बांगलादेशींची ओळख पटविण्यात आली आहे. तर गेल्या ६ महिन्यांत ७०० घुसखोरांना दिल्लीतून हाकलून लावण्यात आले आहे. त्याचप्रमाणे, गुजरातमधून सर्वाधिक घुसखोरां(Bangladeshi Infiltrators)वर कारवाई करण्यात आली. यासोबतच, महाराष्ट्र, आसाम, हरियाणासह इतर काही राज्यांमध्येही घुसखोरांना ओळखण्याची प्रक्रिया वेगवान झाली आहे. देशभरातील अवैध बांगलादेशींना मायदेशात पाठविण्याच्या प्रकियेला सुरूवात झाली आहे.(Bangladeshi Infiltrators)
Join Our WhatsApp Community