मुख्यमंत्रांच्या हस्ते ‘या’ तारखेला होणार Samruddhi Highway च्या अखेरच्या टप्प्याचे लोकार्पण

103
मुख्यमंत्रांच्या हस्ते 'या' तारखेला होणार Samruddhi Highway च्या अखेरच्या टप्प्याचे लोकार्पण

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचा (Samruddhi Highway) ठाणे जिल्ह्यातील आमणे ते नाशिकमधील इगतपुरी दरम्यानचा ७६ किमीचा अखेरचा टप्याचे लोकार्पण येत्या गुरुवारी, 5 जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते इगतपुरी येथे एका विशेष सोहळ्यादरम्यान करण्यात येईल. लोकार्पणानंतर लगेचच हा मार्ग सामान्य वाहतुकीसाठी सुरू होईल.

(हेही वाचा – पॅराग्वेचे राष्ट्राध्यक्ष Santiago Pena Palacios भारत दौऱ्यावर ! PM Modi म्हणाले, “विश्वास, व्यापार आणि सहकार्याला नवी ताकद…”)

समृद्धी महामार्गामुळे (Samruddhi Highway) मुंबईहून जातांना विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांचे प्रवसातील अंतर कमी आणि वेगवान झाले आहे. याआधी मुंबईहून नाशिकला जातांना ३ तास ४५ मिनिटांहून अधिक वेळ लागत होता. तो समृद्धी महामार्गामुळे २ तास ३० मिनिटे इतका कमी झाला आहे. म्हणजेच १ तास २० मिनिटे वाचून सूमारे ४० किमी. अंतर कमी झाले आहे. ७.७४ किमीच्या शहापूर तालुक्यातील सर्वात मोठ्या वाशाळा येथील बोगद्यामुळे कसारा घाट ओलांडणे अतिशय सोपे झाले आहे. ३६ मीटरची रुदी आणि ६ पदरी महामार्गामुळे प्रवास जलद होणार आहे.

(हेही वाचा – Veer Savarkar : महाराष्ट्र शासनाचा ‘हा’ निर्णय तर स्वातंत्र्यवीरांच्या सैनिकीकरणाच्या नीतीचाच विजय)

एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी सांगितले की, इगतपुरी-आमणे या उर्वरित टप्प्याचे काम एप्रिलमध्येच पूर्ण झाले होते. आता हा मार्ग (Samruddhi Highway) सुरू झाल्यानंतर राज्याच्या विविध भागांशी असलेली मुंबईची जोड अधिक जलद, सुरक्षित आणि सुगम होणार आहे. तसेच या प्रकल्पामुळे राज्याच्या औद्योगिक व आर्थिक विकासालाही मोठी चालना मिळणार आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.