Air India Planes आता दुरुस्तीसाठी तुर्कीला जाणार नाहीत; Operation Sindoor नंतर पाकला मदत करणे भोवले

95

तुर्कस्तानसोबत (Turkey) वाढता तणाव लक्षात घेता एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला आहे. (Air India Planes) टाटा समूहाची विमान कंपनी आता आपली विमानं दुरुस्त करण्यासाठी तुर्की कंपनी तुर्कीश टेक्निकवर कमी अवलंबून राहणार आहे. कंपनीचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांनी, एअर इंडिया आता आपली बोईंग ७७७ आणि ७८७ विमानं दुरुस्तीसाठी इतर देशांमध्ये पाठवणार असल्याचं म्हण्टले आहे. भारत सरकारही तुर्कस्तानबाबत कठोर भूमिका घेत आहे. त्यामुळे एअर इंडियानं हा निर्णय घेतला आहे.

(हेही वाचा – Sikkim Landslide : ईशान्येकडील राज्यांमध्ये हाहाकार ! सिक्कीममध्ये लष्करी छावणी परिसरात भूस्खलन, 3 जणांचा मृत्यू, ९ सैनिक बेपत्ता)

लष्कराच्या ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) दरम्यान तुर्कस्ताननं उघडपणे पाकिस्तानला पाठिंबा दिला होता. तेव्हापासून भारतात त्यांच्या उत्पादनांवर आणि सेवांवर मोठ्या प्रमाणात बहिष्कार टाकण्यात आला आहे. विमान दुरुस्ती हा जागतिक व्यवसाय आहे. परिस्थिती बदलली की जुळवून घ्यायला थोडा वेळ लागतो. परंतु, आम्ही राष्ट्रीय भावनांची काळजी घेतो. लोकांना आपल्याकडून काय हवंय हेही आम्ही पाहतो. याचा अर्थ एअर इंडिया भारतातील जनतेला काय हवं आहे ते पाहिल आणि त्यानुसार कृती करेल, अशी प्रतिक्रिया एअर इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कॅम्पबेल विल्सन यांनी दिली.

सध्या, तुर्किश टेक्निक एअर इंडियाच्या काही मोठ्या विमानांची दुरुस्ती करते. यावर विल्सन म्हणाले की, ‘अलीकडील घडामोडी लक्षात घेता, आम्ही आमची विमानं पाठवण्याची ठिकाणं बदलू. आम्ही तुर्कीला कमी आणि इतर देशांमध्ये जास्त विमानं पाठवू. विमानांची दुरुस्ती आवश्यक आहे, त्यामुळे त्यासाठी थोडा वेळ लागेल. आम्ही अलिकडच्या घडामोडी लक्षात घेत आहोत आणि आमच्या योजना बदलू,’ असंही त्यांनी स्पष्ट केलं.

एअर इंडियाकडे एकूण १९१ विमानं आहेत, ज्यात ६४ मोठ्या विमानांचा समावेश आहे. मे महिन्यापासून भारत आणि तुर्कस्तानमधील तणाव वाढलाय. ऑपरेशन सिदूर दरम्यान त्यानी पाकिस्तानला साथ दिली होती. त्यानंतर, १५ मे रोजी, भारताच्या नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरो (बीसीएएस) नं तुर्कस्तानची कंपनी सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेडची सुरक्षा मंजुरी रद्द केली. याचं कारण राष्ट्रीय सुरक्षा असं सांगण्यात आलं. यानंतर, ३० मे रोजी, विमान वाहतूक नियामक डिजिसीएने इंडिगोला तुर्की एअरलाइन्सकडून दोन बोईंग ७७७ विमानं भाड्यानं घेण्यासाठी अंतिम तीन महिन्यांची मुदतवाढ दिली. ही मुदतवाढ ३१ ऑगस्ट रोजी संपत आहे.

भारत सरकार तुर्कस्तानसोबतच्या संबंधांबद्दल सावध आहे. एअर इंडिया देखील सरकारच्या निर्णयाला पाठिंबा देत आहे. त्यामुळे, एअर इंडिया आता आपल्या विमानांच्या दुरुस्तीसाठी तुर्की तंत्रांवर कमी अवलंबून राहील आणि इतर देशांमध्ये उपलब्ध असलेल्या सुविधांचा वापर करेल. (Air India Planes)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.