
पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर मराठा समाजात (Code Of Conduct For Wedding) जागरुकता वाढली असून, अहिल्यानगर येथे झालेल्या बैठकीत विवाह समारंभांसाठी एक आचारसंहिता तयार करण्यात आली आहे. पुण्यात वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येनंतर शाही विवाह सोहळे, हुंडा, मानपान, लग्नातले दिखावे याचीही चर्चा सुरू झाली. यावर अहिल्यानगरमधील मराठा समाजाने अत्यंत पुरोगामी पाऊल उचलत समाजातून हुंडा हद्दपार करण्याचा विडा उचलला आहे. तसेच लग्नातल्या शाही थाटाला काट मारणारी एक आचारसंहिताच जाहीर केली आहे. (Code Of Conduct For Wedding)
हेही वाचा-Hardik Pandya : संघाचा टॉप फलंदाज जॉनी बेअरस्टोसाठी कर्णधार हार्दिक पांड्याने गायलं गाणं
बैठकीचे आयोजन एन. बी. धुमाळ फाउंडेशनतर्फे करण्यात आले होते. हभप बद्रिनाथ महाराज तनपुरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीस मराठा समाजातील अनेक प्रतिष्ठित नेते, संस्था प्रतिनिधी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. (Code Of Conduct For Wedding) बैठकीनंतर तनपुरे महाराजांनी सांगितले की, समाजातील अनिष्ट प्रथा मोडण्यासाठी प्रत्येकाने स्वतःपासून बदल करावा. आचारसंहिता योग्य प्रकारे राबवण्यासाठी तालुकास्तरावर समित्या तयार करण्यात येणार आहेत. (Code Of Conduct For Wedding)
मराठा समाजाच्या लग्न समारंभासाठी आचारसंहिता (Code Of Conduct For Wedding)
1. लग्न सोहळा (100/200) मर्यादित लोकात केला जावा.
2. प्री-वेडिंग प्रकार बंद करावा. केलाच तर तो लग्न सोहळ्यात जाहीर दाखवू नये.
3. कसल्याही परिस्थितीत लग्न वेळेवरच लावावे.
4. लग्नात डीजे नको.पारंपरिक वाद्य, लोक कलावंतांना संधी द्या.
5. कर्ज काढून लग्नात खर्च करू नये. मराठा समाजात लग्नाच्या कर्जामुळेच अनेक आत्महत्या झालेल्या आहेत.
6. नवरदेवापुढे दारू पिऊन नाचणाऱ्या तरुण-तरुणींना पायबंद घालावा.
7. हार घालताना नवरा नवरीला उचलू नका.
8. लग्नात फक्त वधूपिता आणि वर पिता यांनीच फेटे बांधावेत. पाहुण्यांचे फेटे आणि इतर सत्कार बंद करावेत.
9. लग्न, वाढदिवस, उद्घाटन कार्यक्रमात, पुस्तके, झाडाची रोपे किंवा रोख स्वरूपात आहेर करावेत.
10. लग्नात प्रमुख व्यक्तीच्या हस्ते सोन्याचे दागिने, गाडीच्या चाव्या, वस्तू देऊ नयेत. देखावा करू नये.
11. लग्नात हुंडा देऊ-घेऊ नये. वडिलांची खूपच इच्छा असेल तर मुलीच्या नावावर एफडी करावी.
12. लग्न, साखरपुडा, हळद एकाच दिवशी करा.
13. लग्नानंतर मुलीच्या आईने मुलीच्या संसारात ढवळाढवळ करू नये. मोबाईलचा वापर गरजेपुरताच करावा.
14. पैशासाठी सूनेचा छळ करू नये.
15. समाजातील नव उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी आपल्या ऐपतीप्रमाणे आर्थिक मदतीचा हात द्यावा. नुसत्या शुभेच्छा नकोत.
16. जेवणात 5 हून अधिक पदार्थ नकोत.
17. विविध कार्यक्रमानिमित्त होणाऱ्या भोजन प्रसंगी अन्नाची नासाडी टाळण्यासाठी, सुकी भोजन पाकीट व्यवस्था असावी.
18. दशक्रिया विधी पाचव्या दिवशी करा. लग्न आणि दशक्रिया विधीला मान्यवरांचे आशीर्वाद, श्रद्धांजली हा कार्यक्रम बंद करावा. श्रद्धांजलीसाठी गरज वाटल्यास वेगळा विशेष कार्यक्रम घ्यावा.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community