
आसाम, अरुणाचल प्रदेश (Arunachal Pradesh Flood) , मेघालय, मिझोराम आणि त्रिपुरा यांसारख्या राज्यांमध्ये मुसळधार पाऊस, पूर आणि भूस्खलनामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दोन दिवसांत २६ हून अधिक मृत्यू झाले आहेत. आसाममध्ये भूस्खलन आणि पुरामुळे १६ जणांचा मृत्यू झाला. अरुणाचल प्रदेशातील (Arunachal Pradesh Flood) पूर्व कामेंग जिल्ह्यातील बाणा-सेप्पा रस्त्यावरील राष्ट्रीय महामार्ग १३ वर भूस्खलनामुळे एक कार खोल दरीत कोसळली. या अपघातात दोन कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाला. दुसऱ्या एका घटनेत २ जणांना आपला जीव गमवावा लागला. (Arunachal Pradesh Flood)
Heavy rain in multiple districts of Arunachal Pradesh; landslides at many places have crippled normal life. pic.twitter.com/Feg01MHuIh
— Vani Mehrotra (@vani_mehrotra) May 31, 2025
या घटनेची माहिती मिळताच तत्काळ बचावकार्य सुरू करण्यात आले. पण मुसळधार पाऊस, पुन्हा झालेले भूस्खलन आणि रात्रीच्या अंधारामुळे बचावकार्यात अडथळे आले. तरीही पोलिस आणि बचाव पथकांनी त्यांचे प्रयत्न सुरू ठेवले. अनेक तासांच्या अथक शोधकार्यानंतर, महामार्गापासून सुमारे 150 मीटर खोल दरीत सर्व सातही जणांचे मृतदेह सापडले. हे सर्वजण बाना येथील किचांग गावातील रहिवासी होते. (Arunachal Pradesh Flood)
Responding to a massive landslide after 48 hrs of rain at Rann Polyan, Old Ziro (#ArunachalPradesh), 60 Bn #ITBP launched a rescue OP on DC’s call. Two bodies recovered; no further casualties. Ops closed in 4 hrs. #Himveers pic.twitter.com/jgzlErlLjo
— ITBP (@ITBP_official) June 1, 2025
मिझोरममधील सेरछिप येथे १३ घरे कोसळली. एका व्यक्तीचा मृत्यू झाला. पुढील काही दिवस या भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर सिक्कीममध्ये सुमारे १,५०० पर्यटक अडकले आहेत. हिमाचल प्रदेशात वादळाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. चंबा, कांगडा, कुल्लू, मंडी आणि शिमला जिल्ह्यांमधील दुर्गम ठिकाणी हा इशारा देण्यात आला आहे. २ जून रोजी सोलन आणि सिरमौरसाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे. (Arunachal Pradesh Flood)
Devastating landslides in between Seppa & Bana in state of Arunachal Pradesh in which 7 persons deadThe car carrying two families was washed away by landslide while a Tata sumo got stuck in the corner of the road#ArunachalPradesh@praddy06 @ChennaiRains pic.twitter.com/KDLoaweX18
— Shahidarafi (@Shahidarafi51) May 31, 2025
अरुणाचल प्रदेशच्या घटनांशिवाय आसाममध्ये देखील पावसाचा कहर सुरू आहे. आसाममध्ये गेल्या 24 तासात 5 जणांचा मृत्यू झालाय. तर आसामच्या 6 जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण होऊन 10 हजार लोक प्रभावित झाल्याचे राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधीकरणाने म्हंटले आहे. (Arunachal Pradesh Flood)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community