(हेही वाचा – “भारत काय करू शकतो आणि किती अचूकपणे करू शकते हे जगाने पाहिले” ; PM Narendra Modi यांचा पाकला पुन्हा इशारा)
त्यानुसार याबाबत तातडीने कार्यपद्धती निश्चित करणारे परिपत्रक काढून आयुक्तांनी महापालिका यापुढे खाजगी जागेवरील झाडांची आपल्या खर्चातून करेल, असे निश्चित केले. प्रशासनाने या आपल्या आदेशात असे म्हटले आहे की, खाजगी मालमत्तेवरील झाडे / झाडांच्या फांद्या / झावळ्या / फळे (नारळ) इत्यादी महापालिकेच्या रस्ते / पदपथ / इतर मालमत्तेकडे झुकत असल्यास संभाव्य अपघात टाळण्यासाठी, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी व सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करण्याकरिता धोरणात्मक कार्यपद्धती आहे.
(हेही वाचा – Indian Railways : २०३० पर्यंत प्रत्येक प्रवाशाला कन्फर्म तिकीट मिळणार ; जाणून घ्या काय आहे रेल्वेची योजना ?)
खाजगी मालमत्तेवरील झाडे झाडांच्या फांद्या / झावळ्या / फळे (नारळ) महापालिकेच्या रस्ते, पदपथ, वाहतूक बेटे, सार्वजनिक चौक, उद्याने इत्यादीकडे झुकत असल्यामुळे पादचारी, वाहने किंवा सार्वजनिक मालमत्तेस धोका निर्माण होत असल्याने ही कार्यपद्धती मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रात लागू राहील. त्यानुसार, जी झाडे खाजगी जागेत असून त्यांच्या फांद्या महापालिकेच्या रस्ते, पदपथ किंवा सार्वजनिक मालमत्तेकडे झुकलेल्या आहेत आणि त्यामुळे धोका निर्माण होण्याची शक्यता आहे अशी झाडे संबंधित विभागातील एच ए/ जे टी ओ / एएस जी यांनी सर्वेक्षण करावे.
(हेही वाचा – Central Railway वर रात्री ९ नंतर तिकीट खिडक्या बंद; नेमकं काय कारण ?)
संबंधित झाड मालकास संदर्भित झाड / झाडाच्या फांद्या इत्यादी धोकादायक असल्याबाबत व त्याची छाटणी विहित मुदतीत तातडीने करणे आवश्यक असल्याबाबत लेखी नोटीस देण्यात यावी. या नोटिस द्वारे दिलेल्या मुदतीत उपाययोजना न झाल्यास, संबंधित फांद्यांची छाटणी उद्यान विभागाच्या प्रचलित धोरणानुसार महानगरपालिकेच्या निधीतून नियुक्त ठेकेदारामार्फत करण्यात येईल. कार्यवाही ही महापालिकेची सामाजिक जबाबदारी म्हणून केली जाईल. तथापि भविष्यात अशा झाडांमुळे दुर्घटना झाल्यास, त्यासाठी महापालिका जबाबदार राहणार नाही. त्यामुळे ही कार्यपद्धती तात्काळ अंमलात आणावी, असे लेखी निर्देश दिले आहेत.
हेही पहा –