
पहलगाम हल्ला (PM Narendra Modi) आमच्या बंधूभावावर आणि मानवतेवर आक्रमण होते. त्यानंतर भारताने पाकिस्तानातील दहशतवादी अड्ड्यांना लक्ष्य केले. आम्ही काय करू शकतो हे जगाने पाहिल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केले. सिक्कीमच्या 50 व्या वर्धापन दिनानिमित्त व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करताना ते बोलत होते.
Addressing the Sikkim@50 celebrations. Known for its serenity and enterprising people, the state has made remarkable strides across various sectors. https://t.co/Q8Pz9VIu61
— Narendra Modi (@narendramodi) May 29, 2025
पंतप्रधानांना खराब हवामानामुळे सिक्कीम दौरा रद्द करावा लागला. त्यामुळे त्यांनी बागडोगरा येथून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सिक्कीमच्या लोकांना संबोधित केले. (PM Narendra Modi)
यावेळी सिक्कीमच्या 50 व्या स्थापना दिनाच्या शुभेच्छा देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख केला. “सिक्कीममधील तुम्ही सर्वजण पर्यटनाची शक्ती चांगल्या प्रकारे जाणता आणि समजता. पर्यटन हे केवळ मनोरंजन नाही, ते विविधतेचा उत्सव आहे, परंतु दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये जे केले ते केवळ भारतीयांवर हल्ला नव्हता. तो मानवतेच्या आत्म्यावर हल्ला होता, बंधुत्वाच्या भावनेवर हल्ला होता.” असे मोदींनी सांगितले. (PM Narendra Modi)
हेही वाचा-Donald Trump यांच्या ‘टॅरिफ वॉर’ला अमेरिकन कोर्टाकडून स्थगिती !
“पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी आमच्या अनेक कुटुंबांचा आनंद हिरावून घेतला. त्यांनी आम्हा भारतीयांना फूट पाडण्याचेही कट रचला. आज संपूर्ण जग पाहत आहे की भारत पूर्वीपेक्षा अधिक एकजूट झाला आहे. आम्ही एकत्र येऊन दहशतवाद्यांना आणि त्यांच्या आश्रयदात्यांना स्पष्ट संदेश दिला. ‘ऑपरेशन सिंदूर’ द्वारे आम्ही दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले. दहशतवादी तळ उद्ध्वस्त झाल्याने निराश झालेल्या पाकिस्तानने आमच्या नागरिकांवर आणि सैनिकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यातही पाकिस्तानचे रहस्य उघड झाले. आम्ही त्यांचे अनेक हवाई तळ उद्ध्वस्त केले आणि भारत काय करू शकतो आणि केव्हा करू शकतो हे दाखवून दिले. ते किती वेगाने करू शकते, किती अचूकपणे करू शकते.” असे पंतप्रधानांनी सांगितले. (PM Narendra Modi)
हेही वाचा- Ashadhi Wari 2025 : आषाढी वारीत व्हीआयपी गाड्यांना नो एंट्री, टोलमध्ये सवलत मिळणार !
याप्रसंगी मोदी म्हणाले की, गेल्या 50 वर्षांत, सिक्कीम हे निसर्गाच्या सान्निध्यात प्रगतीचे एक मॉडेल बनले. ते जैवविविधतेचे एक मोठे उद्यान बनले. ते 100 टक्के सेंद्रिय राज्य बनले. ते संस्कृती आणि वारशाच्या समृद्धीचे प्रतीक म्हणून उदयास आले. गेल्या दशकात, आमच्या सरकारने ईशान्येला विकासाच्या केंद्रस्थानी आणले आहे. आम्ही ‘अॅक्ट फास्ट’ या विचाराने ‘अॅक्ट ईस्ट’च्या संकल्पावर काम करत आहोत. यावेळी सिक्कीमच्या विकासाशी संबंधित अनेक प्रकल्पांचे पायाभरणी आणि उद्घाटन येथे झाले आहे. मी तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो. सिक्कीमसह संपूर्ण ईशान्य नवीन भारताच्या विकास कथेत एक चमकदार अध्याय बनत आहे. जिथे एकेकाळी दिल्लीपासूनचे अंतर विकासाच्या मार्गात अडथळे होते, आता तेथून विकासाचे नवी दालने उघडत आहेत. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे येथील कनेक्टिव्हिटीमध्ये झालेला बदल. (PM Narendra Modi)
तुम्ही सर्वांनी हा बदल स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला आहे. येथे निसर्ग आहे, अध्यात्म आहे, शांततेच्या छायेत वसलेले तलाव, धबधबे आणि बौद्ध मठ आहेत. येथे कांचनजंगा राष्ट्रीय उद्यान, युनेस्को जागतिक वारसा स्थळ देखील आहे. केवळ भारतच नाही तर संपूर्ण जगाला सिक्कीमच्या वारशाचा अभिमान आहे. आज जेव्हा येथे एक नवीन स्कायवॉक बांधला जात आहे, सुवर्ण महोत्सवी प्रकल्पाचे उद्घाटन होत आहे, अटलजींच्या पुतळ्याचे अनावरण होत आहे. हे सर्व प्रकल्प सिक्कीमच्या नवीन उड्डाणाचे प्रतीक असल्याचे मोदींनी नमूद केले. (PM Narendra Modi)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community