Award : इन्क्रेडिबल इंडिया, इन्क्रेडिबल पीपल अवॉर्ड्सच्या माध्यमातून विविध क्षेत्रांतील अज्ञात हिरोंचा गौरव

यंदाच्या वर्षी विविध क्षेत्रातील ५० अज्ञात पण प्रभावशाली व्यक्तींचा गौरव करण्यात आला.

88

सोलॅस इंडिया ऑनलाईन आणि स्प्रिंग टाईम क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित इन्क्रेडिबल इंडिया, इन्क्रेडिबल पीपल अवॉर्ड्स २०२५ (Award) हा प्रेरणादायी पुरस्कार सोहळा नुकताच स्प्रिंग टाईम क्लब, कल्याण येथे मोठ्या उत्साहात पार पडला. सोलॅस इंडिया ऑनलाईन संस्थेच्या संस्थापिका डॉ. रुपिंदर कौर, रत्नेश महाडिक यांच्या मुख्य संकल्पनेतून आयोजित या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रणजित सावरकर होते. नेहरू युवा केंद्र, संचालक प्रकाश मनुरे, रामदास आणि डॉ. नरेश चंद्रा हे मान्यवर अतिथी होते. मिलन वडिया आणि महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे सचिव डॉ. राकेश तिवारी हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.

यावर्षी विविध क्षेत्रातील ५० अज्ञात पण प्रभावशाली व्यक्तींचा गौरव करण्यात आला. आरोग्य भूषण पुरस्कार (Award) प्रदान करण्यात आलेल्या मान्यवरांमध्ये डॉ. आरती सुर्यवंशी, डॉ. रूपा शाह, डॉ. अश्विन काकर, डॉ. प्रशांत पाटील, डॉ. वंदना धक्तोडे आणि इतरांचा समावेश होता. माजी आमदार नरेंद्र पवार यांना आदर्श नेता पुरस्कार मिळाला. सर्वोत्तम शाळा पुरस्कार पोदार इंटरनॅशनल स्कूलला प्रदान करण्यात आला. इतर उल्लेखनीय पुरस्कार (Award) विजेत्यांमध्ये मराठी अभिनेत्री ज्योती निमसे, अवघ्या १२ वर्षांची रॅपलिंग ॲथलीट मानस्वी, तसेच डिजिटल प्रभाव टाकणारे चैतन्य देशमुख आणि अल्केश चौधरी यांचा समावेश होता.

(हेही वाचा Indo – Pak Tension : नाणेनिधीकडून मिळालेले १.५ अब्ज डॉलर पाकिस्तान कशावर खर्च करणार?)

खेळ क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीसाठी डॉ. संजय काटोळे, अमन वर्मा, रीना माने, निशा गायकवाड आणि ठाणे जिल्ह्यातील सर्व डीएसओ व राज्य-राष्ट्रीय पदक विजेते यांचा सत्कार करण्यात आला. या पुरस्कारांची (Award) मूळ संकल्पना म्हणजे समाजासाठी निस्वार्थीपणे योगदान देणाऱ्या सामान्य व्यक्तींना मंच व सन्मान देणे. हे पुरस्कार केवळ गौरव नसून, ते नव्या भारताच्या उभारणीत मोलाचे योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यांच्या प्रेरणादायी कथा जगासमोर आणण्याचा एक प्रयत्न आहे.

सोलॅस इंडिया ऑनलाईन व स्प्रिंग टाईम क्लब यांच्या माध्यमातून आम्ही असे व्यासपीठ तयार करत आहोत जे युवा, महिला, आरोग्यसेवक, खेळाडू, कलाकार व सामाजिक कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देईल. यंदा १७८ नामांकनं प्राप्त झाल्यामुळे या उपक्रमाची लोकप्रियता व विश्वासार्हता अधोरेखित झाली. कार्यक्रमाचा समारोप एकात्मता, प्रेरणा आणि राष्ट्र निर्मितीतील सहभाग या संदेशासह झाला असल्याची माहिती डॉ. रुपिंदर कौर यांनी दिली.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.