
भारताने ७ मे रोजी ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले आणि पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीर (PoJK) मधील नऊ तळांवर हल्ला केला. हे हल्ले पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून करण्यात आले होते, ज्यामध्ये निष्पाप २६ जणांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. तसेच भारतीय सैन्याने (Indian Army) लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिदीन सारख्या दहशतवादी संघटनांचे अनेक तळ उद्ध्वस्त केले आणि १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला.
(हेही वाचा – ‘Operation Sindoor’नंतर ‘त्या’ १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर वाढला दबाव; नेमकं कारण आलं समोर)
दरम्यान ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने अनेक पाकिस्तानी हवाई तळांवर हल्ला केला. ज्यामध्ये धावपट्टी, हँगर आणि इमारतींचे नुकसान झाले. यामध्ये सरगोधा, नूर खान (चकलाला), भोलारी, जेकोबाबाद, सुक्कूर आणि रहीम यार खान एअरबेसचा समावेश आहे. आता हवाई हल्ल्यामुळे एअरबेसला झालेल्या नुकसानाचे व्हायरल सॅटेलाइट प्रतिमा समोर आल्या आहेत.
एअरबेसवरील नुकसानाचे सॅटेलाइट छायाचित्रे…
जेकबाबाद एअरबेस
हे एअरबेस आंतरराष्ट्रीय सीमेपासून सुमारे २०० किलोमीटर अंतरावर आहे. भारताने जेकबाबाद एअरबेसच्या हँगरला लक्ष्य केले. हँगर म्हणजे अशी जागा जिथे विमानांची दुरुस्ती आणि देखभाल केली जाते. ११ मे रोजीच्या या फोटोमध्ये हँगर खराब झालेले आणि त्याच्याभोवती पडलेला कचरा दिसतो. ३० एप्रिलच्या जुन्या फोटोमध्ये रचना चांगली दिसत होती.
भोलारी एअरबेस
हे पाकिस्तानचे नवीन एअरबेस आहे, जे २०१७ मध्ये कार्यरत होते. भारताने स्ट्राइक दरम्यान भोलारी एअरबेसवरील हँगरवर हल्ला केला, ज्यामुळे त्याच्या छताला मोठे नुकसान झाले. २७ एप्रिलच्या सॅटेलाईट फोटोमध्ये हे हँगर पूर्णपणे शाबूत दिसत होते.
सुक्कुर एअरबेस
हे एअरबेस सिंध प्रांतात आहे आणि ते पाकिस्तानच्या दक्षिणी हवाई कमांडद्वारे चालवले जाते. १० मे रोजीच्या छायाचित्रांवरून स्पष्टपणे दिसून येते की इमारतीचे मोठे नुकसान झाले आहे आणि कचरा सर्वत्र पसरलेला आहे. जवळच जळालेले गवत आणि जमिनीवर काळे डाग आहेत, कदाचित हल्ल्यानंतर लागलेल्या आगीमुळे हे घडले असावे.
नूर खान एअरबेस (चकलाला)
हे एअरबेस रावळपिंडी आणि इस्लामाबाद दरम्यान आहे. रावळपिंडी हे पाकिस्तानच्या लष्कराचे मुख्यालय आहे आणि इस्लामाबाद हे त्याचे राजकीय केंद्र आहे. १९७१ च्या युद्धातही भारताने याला लक्ष्य केले होते. उपग्रह प्रतिमांमध्ये अनेक इमारती उद्ध्वस्त झाल्याचे दिसून येते. २५ एप्रिल रोजी काढलेल्या छायाचित्रांमध्ये, सर्व इमारती चांगल्या स्थितीत होत्या.
रहीम यार खान हवाई तळ
हे एअरबेस पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात आहे आणि बहावलपूरपासून सुमारे २०० किलोमीटर दक्षिणेस आहे. बहावलपूर हे तेच ठिकाण आहे जिथे भारताने ७ मे रोजी ऑपरेशन सिंदूरचा पहिला हल्ला केला होता. एअर मार्शल ए.के. भारती यांनी पत्रकार परिषदेत या एअरबेसच्या धावपट्टीला झालेल्या नुकसानीचा व्हिडिओ दाखवला होता. उपग्रह छायाचित्रांमध्ये धडकेमुळे धावपट्टीच्या बाजूला एक मोठा खड्डा दिसून आला आहे.
सरगोधा एअरबेस
हे एअरबेस पाकिस्तानी हवाई दलासाठी धोरणात्मकदृष्ट्या खूप महत्त्वाचे आहे. हे लाहोरच्या पश्चिमेस आणि पंजाब सीमेपासून सुमारे २०० किलोमीटर अंतरावर आहे. १९६५ आणि १९७१ च्या युद्धांमध्ये भारतीय हवाई दलानेही याला लक्ष्य केले होते.
ऑपरेशन सिंदूरमध्ये, भारताने येथे दोन ठिकाणी धावपट्ट्यांना लक्ष्य केले – एक चौकात आणि दुसरा मुख्य धावपट्ट्यावर. १० मे रोजीच्या छायाचित्रांमध्ये दोन्ही ठिकाणी धावपट्ट्यांवर मोठे खड्डे दिसत आहेत. ३० एप्रिल आणि १० मे च्या चित्रांमध्ये हा फरक स्पष्टपणे दिसून येतो.
हेही पहा –