पहलगाम दहशतवादी हल्ल्या(Pahalgam Terror Attack)चा जगभरातून निषेध व्यक्त करण्यात आला. रशिया, अमेरिका, चीन, फ्रान्स यांसारख्या बड्या राष्ट्रांनी भ्याड हल्ल्याचा निषेध केला असून दहशतवादाविरोधात कठोर भूमिका घेण्यासाठी जाहीर पाठिंबादेखील दिला. यातच आता परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी युरोपियन युनियनच्या विधानावर जाहीर संताप व्यक्त केला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्या(Pahalgam Terror Attack)वरील युरोपियन युनियनच्या विधानावरून एस जयशंकर यांनी खडेबोल सुनावले आहेत. ते म्हणाले, आम्हाला सल्ला देणाऱ्या लोकांची नव्हे तर पाठिंबा देणाऱ्या लोकांची गरज आहे.
(हेही वाचा Pahalgam Terror Attack : हवाई दल प्रमुखांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट )
दरम्यान, भू-राजकीय मुद्द्यांवरून भारताच्या भूमिकेवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या युरोपियन देशांवर टीका करताना परराष्ट्र मंत्री म्हणाले, भारत उपदेशक नव्हे तर एक भागीदार शोधत आहे. त्याचबरोबर, युरोपमधील काही देश अजूनही याच समस्येशी झुंजत आहेत, असेही मंत्री एस. जयशंकर यावेळी म्हणाले. यरोपच्या समस्या जगाच्या परंतु, जगाच्या समस्या युरोपच्या नाहीत अशा मानसिकतेतून युरोपला बाहेर पडण्याची गरज आहे, अशा शब्दांत परराष्ट्रमंत्र्यांनी युरोपियन युनियनची कानउघाडणी केली.
भारताला युरोपकडून काय अपेक्षा आहेत असे विचारले असता, परराष्ट्रमंत्र्यांनी कठोर शब्दांत उत्तर दिले. ते म्हणाले, जेव्हा आपण जगाकडे पाहतो तेव्हा आपण भागीदार शोधतो, आपण उपदेशक शोधत नाही. विशेषतः असे उपदेशक जे परदेशात उपदेश करतात परंतु स्वतःच्या देशात त्याचे पालन करत नाहीत. मला वाटते की युरोपचे काही भाग अजूनही त्या समस्येशी झुंजत आहेत तर काही बदलले आहेत, असेही परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी सांगितले.(Pahalgam Terror Attack)
Join Our WhatsApp Community