ऋजुता लुकतुके
Shahid Afridi : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शाहीद आफ्रिदीनं भारताविरोधात गरळ ओकली होती. त्यावर केंद्रसरकारने याची दखल घेत आता त्याची युट्यूब वाहिनी भारतात बंद केली आहे. भारतात कोणताही व्यक्ती यापुढं शाहीद आफ्रिदीचा यूटयूब चॅनेल पाहू शकणार नाही. भारत सरकारने यापूर्वी देखील काही पाकिस्तानी वृत्तवाहिन्या आणि क्रिकेटपटूंच्या यूट्यूब चॅनेलवर बंदी घातली होती. शोएब अख्तर, राशिद लतीफ आणि तनवीर अहमद या खेळाडूंच्या यूट्यूब चॅनेलवर भारतात बंदी घालण्यात आली आहे. (Shahid Afridi)
(हेही वाचा – Siren system : भारताच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये वाढली भीती, ‘या’ शहरांमध्ये बसवले सायरन सिस्टीम)
जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यासंदर्भात शाहीद आफ्रिदीनं एक वक्तव्य केलं होतं. तो म्हणालेला की या घटनेवर राजकारण होऊ नये यावर माझा विश्वास आहे. मात्र, जसा पाकिस्तानमध्ये हल्ला झाला तसा थेट पाकिस्तानचं नाव घेतलं गेलं. भारताने पुराव्यासह समोर यावं आणि जगाला सांगावं, कोणताही धर्म दहशतवादाला पाठिंबा देत नाही, असं शाहीद आफ्रिदी म्हणाला. या बडबडीनंतर शाहीद आफ्रिदीचा एक जुना व्हीडिओ भारतात व्हायरल होत आहे. एका क्रिकेट स्पर्धेतील पराभवानंतर आफ्रिदीवर पाकिस्तानी जनतेनंच हल्ला करत त्याचं लाथा-बुक्क्यांनी स्वागत केलं होतं. तो व्हीडिओ आता भारतात व्हायरल होत आहे.
Tu mujhe kya chai pilayega bkl,tujhe to khud ke log chai nahi pilatepic.twitter.com/hoE1W9NFqT https://t.co/m2bSgiNC58
— Shikkar Dhawen🐦 (@76off43) April 29, 2025
अर्थात, हा व्हीडिओ २०१२ चा आहे. आणि विमानतळावरच आफ्रिदीला लोकांनी घेरलं होतं. पहलगाम हल्ल्यानंतर आफ्रिदी सलग काही दिवस प्रतिक्रिया देत होता. आणि आपली बडबड त्याने कायम ठेवली होती. भारतात जे घडलं ती खेदाची गोष्ट आहे, पाकिस्तानात जे होत असतं ते देखील खेदजनक असते. मात्र, असं होऊ नये. तो म्हणाला दोन्ही शेजारी देशांनी चांगल्या प्रकारे राहायला हवं, लढाई आणि वाद टाळावेत.
(हेही वाचा – Mumbai Crime : अंधेरीत बॉम्ब ठेवल्याची अफवा ; संशयीत ताब्यात)
शाहिद आफ्रिदीनं वायफळ बडबड सुरुच ठेवली. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतातील माध्यमांचं बॉलिवूड झाल्याचं म्हटलं. प्रत्येक गोष्टीला बॉलिवूड करु नका, मी हैराण झालो, इतर लोक याची मजा घेत होते. भारतात फटाका फुटला तरी लोक म्हणतात पाकिस्ताननं फोडला. तुमची ८ लाख सैन्याची फैज काश्मीरमध्ये आहे. म्हणजेच तुम्ही तुमच्या लोकांना सुरक्षा देऊ शकला नाही,असं शाहीद आफ्रिदी म्हणाला होता.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community