Siren system : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam terrorist attack) भारत सरकार पाकिस्तानविरुद्ध कठोर कारवाई करत आहे. भारताच्या या कृतीमुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण सतत वाढत आहे. या भीतीमुळे, खैबर पख्तूनख्वा प्रांताच्या सरकारने राज्यातील किमान २९ जिल्ह्यांमध्ये आपत्कालीन सायरन (Pakistan Emergency Siren) बसवण्याची घोषणा केली आहे. ज्यामुळे, भारताकडून होणाऱ्या कोणत्याही हवाई हल्ल्यादरम्यान, सायरन वाजवून लोकांना सतर्क केले जाईल. (Siren system)
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी सलग बैठका घेतल्या असताना पाकिस्तानने हे पाऊल उचलले आहे. या बैठकीमुळे पाकिस्तान इतका घाबरला की त्याला भारताकडून हवाई हल्ल्याची भीती वाटू लागली. भारताकडून संभाव्य हल्ल्याच्या भीतीने पाकिस्तानने गुरुवारी सायरन बसवण्याची घोषणा केली. याच्या मदतीने पाकिस्तान सरकार ते आपल्या नागरिकांना हवाई हल्ल्यांबद्दल किंवा इतर आपत्कालीन परिस्थितीबद्दल सतर्क करू शकते.
(हेही वाचा – Mumbai Crime : अंधेरीत बॉम्ब ठेवल्याची अफवा ; संशयीत ताब्यात )
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांताच्या सरकारने राज्यातील २९ जिल्ह्यांमध्ये आधुनिक इलेक्ट्रिक सायरन सिस्टम बसवण्याची घोषणा केली आहे. खैबर पख्तूनख्वा येथील बाजौरमधील ११२२ इमारतींवर आतापर्यंत सायरन सिस्टीम बसवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय इतर ठिकाणीही सायरन सिस्टीम बसवण्याचे काम सुरू आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community