
-
प्रतिनिधी
“संयुक्त महाराष्ट्राच्या उभारणीचा इतिहास राष्ट्रवादी काँग्रेसने नव्या पिढीपुढे मांडला आहे. याचा निश्चितच फायदा होणार आहे,” असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांनी ‘गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव २०२५’च्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले.
वरळीच्या जांबोरी मैदानात पार पडलेल्या या भव्य महोत्सवात पाच दालनांतून महाराष्ट्राच्या इतिहासाचा, संस्कृतीचा आणि विचारांचा ठसा उमटवण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar), प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनिल तटकरे यांच्या उपस्थितीत महोत्सवाचे उद्घाटन झाले. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की, बेळगाव, कारवारचा भाग महाराष्ट्रात यायचा आहे तोवर लढा सुरू राहील. शिव – शाहू – फुले – आंबेडकरांचे विचार कधीही सोडणार नाही, असा निर्धार त्यांनी केला.
(हेही वाचा – पाकिस्तान्यांशी ‘गोतावळा’ वाढवून भारतात राहणाऱ्या मुसलमान महिलांचा Farooq Abdullah यांना वाटतोय कळवळा; म्हणाले… )
प्रफुल्ल पटेल यांनी विरोधकांवर टीका करत, “उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या (DCM Ajit Pawar) शब्दांतच नव्हे तर मनातही ‘राम’ आहे, दांभिक पुरोगाम्यांप्रमाणे नव्हे,” असे म्हणत अप्रत्यक्षपणे विरोधी पक्षांवर निशाणा साधला. छगन भुजबळ यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा इतिहास उलगडताना पहलगाम हल्ल्याचा कठोर शब्दांत निषेध केला. “फक्त सर्जिकल स्ट्राईक नव्हे, आता त्यांची ‘सर्जरी’च हवी,” असे त्यांनी ठणकावले.
कार्यक्रमात पद्मविभूषण जावेद अख्तर, सदानंद मोरे, मधुकर भावे आणि कुमार कदम यांचा सन्मान करण्यात आला. हा महोत्सव महाराष्ट्राच्या समृद्ध वारशाची आठवण करून देणारा ठरला असून, राज्याच्या गौरव दिनाच्या रूपात दरवर्षी साजरा करण्याचा संकल्प तटकरे यांनी जाहीर केला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community